AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board 10th Result : कुठल्या विभागाचा दहावीचा निकाल सर्वात कमी; तुमचा विभाग यात येतो का?

Maharashtra Board 10th Result 2024 : नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलायं. यंदा राज्याच्या निकालात वाढ झालीये. हेच नाही तर दरवेळीप्रमाणेच दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलीये. मुलींनी निकालात धमाका केलाय. नऊ विभागांमध्ये दहावीची परीक्षा ही पार पडलीये.

Maharashtra Board 10th Result : कुठल्या विभागाचा दहावीचा निकाल सर्वात कमी; तुमचा विभाग यात येतो का?
10th Result
| Updated on: May 27, 2024 | 4:51 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. मार्च महिन्यात राज्यात दहावीची परीक्षा झाली. आता याचाच निकाल लागलाय. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्क्यात वाढ झालीये. हेच नाही तर नेहमीप्रमाणेच दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. मुलींच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. राज्याचा निकाल यंदा 95.81 टक्के लागलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढलाय. 21 मे रोजी बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांच्या नजरा या दहावीच्या निकालाकडे होत्या.

सकाळी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागीय टक्केवारी आणि राज्याची एकून टक्केवारी ही जाहीर केली. यंदा कोकणच विभाग निकालात अव्वल ठरलाय. कोकण विभागासह पुणे विभागाचा निकाल देखील चांगला लागलाय.

यंदा सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. नागपूर विभागाच्या निकालात मोठी घसरण बघायला मिळतंय. नऊ विभागापैंकी सर्वात खाली यंदा नागपूर विभाग आहे. सर्वात जास्त निकाल यंदा कोकण विभागाचा असून 99.01 टक्के विभाग कोकण विभागाचा आहे. पुणे विभागाचा निकाल 96.44 आहे. संभाजीनगर विभागाचा 95.19 टक्के आहे.

मुंबई विभागाचा 95.83 टक्के, कोल्हापूर विभागाचा 97.45 टक्के, अमरावती विभागाचा 95.58 टक्के, नाशिक विभागाचा 95.28 टक्के, लातूर विभागाचा 95.27 टक्के, नागपुर विभाग 94.73 टक्के याप्रमाणे दहावीचा निकाल लागलाय. या निकालात लातूर विभागाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलीये. विशेष म्हणजे लातूरच्या 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळणार आहेत.

पहिल्यांदाच दहावीचा निकाल हा मे महिन्यात लागलाय. दरवर्षी दहावीचा निकाल हा जून महिन्यात लागतो. मात्र, पहिल्यांदाच असे झाले की, निकाल हा मे महिन्यात लागलाय. विद्यार्थी हे गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाची वाट पाहत होते. शेवटी दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आलाय. धमाकेदार कामगिरी विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात नक्कीच केलीये.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.