AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान

गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने खास रणनिती तयार केली आहे. राष्ट्रवादीसोबत जागा वाटप करताना शिवसेनेने काही महत्त्वांच्या परिसरातील जागांवरच लक्ष केंद्रीत केलं आहे.

VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान
उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेनेची फिल्डिंग, उमेदवारी अर्ज मागे घेणार; भाजपचा गेम होणार?
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 12:10 PM
Share

पणजी: गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने खास रणनिती तयार केली आहे. राष्ट्रवादीसोबत जागा वाटप करताना शिवसेनेने काही महत्त्वांच्या परिसरातील जागांवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवसेनेने जागा घेताना महाराष्ट्राच्या लगतच्या मतदारसंघातील जागाच घेतल्या आहेत. मराठी बहुल परिसर असल्याने त्याचा फायदा मिळवण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केल्याचं सांगितलं जात आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मापूसा, मांद्रे, वाळपई, मये, पराये असे जे महाराष्ट्राच्या लगतचे मतदारसंघ आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे उमदेवार उभे राहतील. मुंबईतील कार्यकर्ते आणि गोव्यातील कार्यकर्ते काम करणार आहेत. राष्ट्रवादी आज किंवा उद्या त्यांचे उमेदवार जाहीर करतील. आमच्यात मतदारसंघावरून वाद नाही. एखादं दुसऱ्या मतदारसंघावरून किरकोळ वाद होते. दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा होता. विशेषता कुठळी मतदार संघावर दोन्ही पक्षाचा दावा होता. तो बसून सोडवला, असं राऊत म्हणाले.

फडणवीसांचा तंबू इथे पडलाय

गोव्यातील चित्रं धुसर आणि अस्पष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्ष देशातील त्याने गोव्याची प्रयोग शाळा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. तृणमूलचे प्रमुख बसले आहेत. आमचे देवेंद्र फडणवीसांचा तंबू इथे पडला आहे. काँग्रेस आहे. शिवसेना तर आहेच. लढू आणि जिंकू, असंही त्यांनी सांगितलं.

‘बाबूशचं कुटुंब, भाजपची जबाबदारी’

बाबूश मॉन्सेरात यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने तिकीट दिल्याने त्यावरही त्यांनी टीका केली. बाबूश मॉन्सेरात यांच्या बाबतीत ‘बाबूशचं कुटुंब, भाजपची जबाबदारी’ असं चित्रं आहे. महाराष्ट्रातील ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ सारखं. आमची पर्रिकर कुटुंबाशी सदभावना आहे. ती व्यक्त केली. या पलिकडे भाजपच्या यादीशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांच्या निवडणुकीशीही संबंध नाही. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने लढावं, असंही ते म्हणाले.

आम्ही एवढे निर्दयी नाही

राऊतांनी मनोहर पर्रिकरांवर टीका केली होती, असं फडणवीस म्हणाले होते. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं. तुम्हीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आजारावर बोलला आहात. तेव्हा पर्रिकर सक्रिय नव्हते. त्यावर कुणी बोलू शकतो. याचा अर्थ पर्रिकरांच्या बाबतीत दुर्देवी घटना व्हावी अशी आमची इच्छा नव्हती. एवढे आम्ही निर्दयी नाहीत. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. उत्पल पर्रिकरांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. पण ते अपक्ष राहिले तर त्यांच्याबाबत सर्वांनी मदत केले पाहिजे, असंही ते म्हणाले. गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकूकडे चालली आहे. आम्ही आमच्या जागा जिंकून आणू, जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचे स्थान असेल, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

आम्ही ‘सोंगाड्या’ नक्कीच नाही, चंद्रकांत पाटील म्हणजे ‘टॉलस्टॉय’ नाहीत, संजय राऊतांना फडणवीस, चंद्रकांतदादांवर निशाणा

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल

गोव्यातील राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेलं, आम्ही सर्वसामान्यांना उमेदवारी देणार: संजय राऊत

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.