AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांनी बेळगावात जावून मुद्दा खेचला, अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वात मोठा दावा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये घणाघात केला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर सडकून टीका केली.

संजय राऊत यांनी बेळगावात जावून मुद्दा खेचला, अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वात मोठा दावा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2023 | 10:58 PM
Share

बेळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावात गेले आहेत. संजय राऊत यांची आज बेळगावात सभाही झाली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद बद्दल मोठा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “शिवसेना नसती तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं. बाबरी पाडणारे शिवसैनिक होते. शेपूट टाकून पळणारे भाजपावाले होते. बाबरी यांनी पाडलीचं नाही आणि आम्हाला शिकवतात”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

“भगवा रंग शिवसेना आणि एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर शोभतो. भारत माता ढोंग्यांची नाही तर आपली आहे. मी कर्नाटकात येत असताना काँग्रेस, भाजप आणि मिंदे गटाचे नेते विमानात होते. मी विचारलं बेळगावला कुणाच्या प्रचाराला? काँग्रेसवाले म्हणाले काँग्रेसच्या, भाजपवाले म्हणाले भाजपच्या. मी म्हटलं लाज वाटत नाही का? मराठी माणसाविरोधात प्रचार करण्यासाठी येथे आलात”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘थू तुमच्या जिंदगानीवर’

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठी विरोधात सभा घेणार आहेत. थू तुमच्या जिंदगानीवर. बेळगाववरील भगवा उतरवला तेव्हा अभय पाटील कुठे होता? कोरोना काळात कोडुसकर येथे उतरले होते. आमच्या पराभवासाठी मुख्यमंत्री येथे येत आहेत. मराठी माणसाच्या पराभवासाठी शिंदे येतात हे निर्लज्जपणाचा कळस आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही तुरुंग खूप पाहिलेली आहेत. मी चार महिने जेलमध्ये होतो. शिवसेनेला रोखण्यासाठी मला जेलमध्ये टाकलं. मी येथे आलो तेव्हा उद्धव ठाकरेंचा मला फोन आला. त्यांनी विचारलं वातावरण कसं आहे? मी म्हटलं आधी सीमा भाग जिंकू आणि महाराष्ट्रात शिवसेना जिंकेल”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

“तुमचा आणि आमचा भगवा वेगळा नाही. आपलं दैवत एकच, छत्रपती शिवाजी महाराज. सीमा भागासाठी बाळासाहेबांनी भोगलं, भाजपचे लोक चोर-लंफगे आहेत. वेळ पडली तर गरज पडली तर शिवसेना सीमा भागासाठी छातीवर वार झेलायला तयार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“बेळगावात महाराष्ट्रातील अनेक नेते येतात. मराठी माणसाला हरवण्यासाठी खोके येथे येणार आहेत. पण सीमाभागाचं नातं तुम्हाला माहिती नाही. महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार हे आमचे उमदेवार आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढत आहोत. यावेळी एकीची व्रजमूठ मला या ठिकाणी पाहिला मिळत आहे”, असा दावा राऊतांनी केला.

“हिंदुत्वाचा प्रचार येथे करत आहेत. यांचं हिंदुत्व खोक्यात आहे. शिवसेना फोडली तेव्हा हे कुठे होते? अयोध्येला हिंदुंचं आम्ही रक्षण केलं. शिवसेना फोडताना हिंदुत्व आठवलं नाही का?”, असा सवाल राऊतांनी केला.

“काश्मीर यांना सांभाळता आलं नाही. मी काश्मीरच्या माजी राज्यपालांना भेटायला गेला होतो. पुलवामात 40 जवानांचा हत्या होणार आहे, असा अहवाल गुप्तचर खात्यांनी दिला होता. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना हा अहवाल देण्यात आला होता. 40 जवानांना यांनी मरू दिलं”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.