AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील तटकरे यांची मंत्रिपदाची संधी हुकली; अजितदादा गटातील हा नेता होणार केंद्रीय मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या शपथविधी होणार आहे. मोदी यांच्यासोबत 36 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे यावेळी कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यासाठी आतापासूनच सेटिंग सुरू झाली आहे. अजित पवार गटालाही यावेळी एक मंत्रिपद देण्यात येणार आहे.

सुनील तटकरे यांची मंत्रिपदाची संधी हुकली; अजितदादा गटातील हा नेता होणार केंद्रीय मंत्री
अजितदादा गटातील कोणता नेता होणार केंद्रीय मंत्री
| Updated on: Jun 08, 2024 | 2:30 PM
Share

नरेंद्र मोदी हे उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील भाजपच्या चार मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. तर शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे. तसेच अजितदादा गटाला फक्त एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणर आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत होतं. पण तटकरे यांचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पटेल यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब करण्यात आलं आहे. अजित पवार, सुनील तटकरे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पटेल उद्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अनुभवाचा फायदा

प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी नागरी आणि उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे पक्षाच्या वाट्याला येणारं कॅबिनेट मंत्रीपद नवख्या व्यक्तीकडे देण्याऐवजी अनुभवी व्यक्तीकडे देण्याचा बैठकीचा कल होता. त्यामुळेच पटेल यांना मंत्री करण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जातं. पटेल यांना नागरी उड्डाण मंत्रीपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

शिंदे गटातून चौघे चर्चेत

शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी चार नावे चर्चेत आहेत. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांची नावे शिंदे गटातून चर्चेत आहे. मात्र, एकच कॅबिनेट मंत्रीपद असल्याने पद कुणाला द्यायचं याचं टेन्शन मुख्यमंत्र्यांना आल्याचं सांगण्यात येतं. मेरिटवरच निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मेरिट नुसार श्रीकांत शिंदे यांची संसदीय गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठीही हाच निकष लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. शिंदे यांच्याकडे मंत्रीपद आल्यास ठाणे जिल्ह्याला दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळणार आहे.

Follow Us
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!