AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाचा पराभव तर कुणाची जीत, तरीही कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते करताहेत आनंद साजरा

भाजपच्या एका कार्यालयात भाजप कार्यकर्ते आनंदाने नाचत आहेत. एकमेकांना मिठाई भरवत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्तेही आनंदाने एकमेकांना पेढे देत आहेत. लखनऊमध्ये असे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

कुणाचा पराभव तर कुणाची जीत, तरीही कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते करताहेत आनंद साजरा
NARENDRA MODI, RAHUL GANDHI, AKHILESH YADAVImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 07, 2024 | 5:08 PM
Share

नवी दिल्लीमध्ये NDA संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत NDA संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली. त्यामुळे देशात पुन्हा भाजप एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील भाजप कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी या निवडीबद्दल मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. भाजप कार्यालयाबाहेर पुन्हा एकदा मोदी सरकारच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर, दुसरीकडे वाराणसीमध्ये मोदी यांच्या विरोधात लढणारे कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांच्या पराभवानंतरही काँग्रेसचे कार्यकर्ते पेढे वाटून जल्लोष करत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपपेक्षा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला जास्त जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाला 37 तर भाजपला 33 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसलाही 6 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला अपेक्षित असे हे यश आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधान आले आहे. त्यातही मोदी यांच्या विरोधात पराभूत झालेले अजय राय यांच्याबद्ल काँग्रेस कार्यकर्त्यांना विशेष अप्रूप वाटत आहे.

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढविणारे अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे. लखनऊमध्ये आल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अजय राय यांचा निवडणुकीमध्ये दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. मात्र, अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांनी कडवी टक्कर दिली, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे. कारण आधीच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे अंतर खूपच कमी झाले आहे. त्यामुळे पराभूत झाले तरी मोदी यांच्या मतांचे अंतर कमी झाल्याचा आनंद कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

वाराणसी लोकसभा मतदार संघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील शहर दक्षिणमध्ये मोदी यांना 97878 मते तर अजय राय यांना 81732 मते मिळाली. येथे मोदी यांनी 1032 मतांची आघाडी घेतली होती. मोदी यांना शहर उत्तर मध्ये 131241, वाराणसी कॅन्टमधून 145922, रोहनिया 127508 आणि सेवापुरी विधानसभा मतदारसंघातून 108890 मते मिळाली. तर याच मतदारसंघातून अजय राय यांना अनुक्रमे 101731, 87645, 101225, 86751 अशी मते मिळाली आहेत. मतांची ही आकडेवारी पहाता राय यांनी मोदी यांना काटे की टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. अजय राय यांच्या याच कामगिरीवर काँग्रेस कार्यकर्ते खुश झाले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.