AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP ELECTION 2022 : उत्तर प्रदेशाच्या रणसंग्रामासाठी भाजप तयार, 44 ओबीसी, 19 एससी उमेदवारांना तिकीट; सोशल इंजीनियरिंगवर भर

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. भाजपने आज 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

UP ELECTION 2022 : उत्तर प्रदेशाच्या रणसंग्रामासाठी भाजप तयार, 44 ओबीसी, 19 एससी उमेदवारांना तिकीट; सोशल इंजीनियरिंगवर भर
योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधीImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 2:23 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. भाजपने आज 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 21 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तसेच या यादीत भाजपने ओबीसी, एससींना मोठ्या प्रमाणावर तिकीट देऊन सोशल इंजीनियरिंगवर भरही दिला आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकूण 107 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हे 21 उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवतील. तर, 21 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांना तिकीट

भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील यादीत 63 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं आहे. ज्या 107 उमेदवारांना भाजपने तिकीट दिलं त्यामध्ये 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांचा समावेश आहे. म्हणजे भाजपाने पहिल्या यादीत ओबीसी, एससी आणि महिला आदी 68 टक्के उम्मीदवारांना तिकीट दिलं आहे.

भाजप बॅकफूटवर

दरम्यान, उत्तर प्रदेशात तीन कॅबिनेट मंत्री आणि सहा आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळेच भाजपची निवडणूक यादी उशिराने आली आहे. 2017ची पुनरावृत्ती घडवून आणण्याचा दबाव असतानाच मंत्री आणि आमदारांनी पक्ष सोडल्याने भाजप बॅकफूटवर आहे. त्यामुळे पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

403 जागांसाठी रणसंग्राम

उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

महत्त्वाचे उमेदवार

शामली- तजेंद्र सिंह निर्वाल बुढ़ाना- उमेश मलिक चरथावल- सपना कश्यप पूरकाजी- प्रमोद ओटवाल मुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवाल खतौली- विक्रम सैनी मीरापूर- प्रशांत गुर्जर सिवालखास- मनेंद्र पाल सिंह सरदना- संगीत सोम हस्तिनापूर- दिनेश खटीक मेरठ कँट- अमित अग्रवाल किठोर- सत्यवीर त्यागी मेरठ- कमलदत शर्मा मेरठ साउथ- सोमेंदर तोमर छपरउली- सहेंद्र सिंह रमाला बड़ोत- केपी सिंह मलिक बागपत- योगेश धामा लोनी- नंदकिशोर गुर्जर मुरादनगर-अजीत पाल त्यागी साहिबाबाद- सुनील शर्मा

संबंधित बातम्या:

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार नाही, सेफ मतदारसंघातून लढणार; उपमुख्यमंत्री मोर्य सिराथूमधून मैदानात

VIDEO: काँग्रेसला गोव्यात 40 पैकी 45 जागा मिळतील, महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा सणसणीत टोला

Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली