कपिल शर्माच्या शोला कॉमेडी नडली, थेट कायदेशीर नोटीस; सलमान खानच्या टीमने केले हात वर म्हाणाले,” आमचा काय संबंध….”
कपिल शर्माच्या शोमधील एका विनोद करून बंगाली समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. यामुळे शोला कायदेशीर नोटीस मिळाली आहे.

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या शोमध्ये कोणत्यातरी विनोदावरून कोणाची तरी नाराजी किंवा ट्रोल झालेल्या घटना बऱ्याचदा घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा या शोमध्ये केलेल्या कॉमेडीमुळे शोमधील कलाकारांसह प्रॉडक्शन हाऊसही अडचणीत आले आहे.
सलमान खानच्या टीमचे हात वर
‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोला कायदेशीर नोटीस मिळाली आहे. ही कायदेशीर नोटीस 1 नोव्हेंबरला पाठवण्यात आली आहे. बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि महान कवी रवींद्रनाथ टागोर यांची खिल्ली उडवल्याचा आरोप या कार्यक्रमावर करण्यात आला आहे.
- Kapil Sharma Show controversy
दरम्यान सलमानही या शोच्या निर्मात्यांपैकी एक असल्याचा समज असल्याने सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसलाही या वादात कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, सलमानच्या टीमने आपला या शोशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रिपोर्टनुसार, सलमान खानच्या टीमने स्पष्ट केले आहे की सलमान खान किंवा SKTV ला देखील नोटीस मिळाली आहे, जे चुकीचे आहे. कारण आम्ही नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोशी जोडलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
गेल्या आठवड्यात, दो पत्ती चित्रपटाची स्टारकास्ट काजोल आणि क्रिती सेनन शोमध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेकने जॅकी श्रॉफची नक्कल करत एक अभिनय केला. जिथे त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचे प्रसिद्ध गाणे ‘एकला चलो रे’ बदलले. म्हणजे कृष्णाने ‘एकला’ या शब्दाच्या जागी ‘पाचला’ शब्द टाकला, ज्याचा अर्थ ‘पाच लोकांसोबत चालणे’ असा होतो.
- Kapil Sharma Show controversy
पुढे तो गंमतीने म्हणाला की एकट्याने चालल्याने कुत्रे त्याच्या मागे लागतात. या एपिसोडवर प्रेक्षक खूप हसले असले तरी बंगाली समुदायाला ते अजिबात आवडलं नाही. बंगाली कवी सृजतो बंद्योपाध्याय यांनी फेसबुकवर याचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी लिहिले की, “विनोद करणे आणि मजा करणे यात फरक आहे आणि ती पातळी ओलांडणे धोक्याचे असू शकते”
तसेच ते पुढे म्हणाले,” आपण कोणाची चेष्टा करतोय, काय बोलतोय आणि कुठल्या टोकाला जातोय याकडे अनेकदा लोक लक्ष देत नाहीत. हे सर्व उच्च रेटिंग मिळवण्याच्या आणि लोकांना हसवण्याच्या इच्छेने घडते. रेषा कुठे काढायची ते विसरतात”.
- Kapil Sharma Show controversy
दरम्यान संगीत दिग्दर्शक इंद्रदीप दासगुप्ता, गायिका इमान चक्रवर्ती आणि चित्रपट निर्मात्या सुमन मुखोपाध्याय यांनीही या भागाचा निषेध केला आहे. बोंगो भाषा महासभा फाउंडेशनने आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये दावा केला आहे की, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘एकला चलो रे’ हे गाणे बंगाली घराघरात आदरणीय गाणे आहे.
त्यामुळे या गाण्याची खिल्ली उडवून सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा ओलांडल्या असल्याचे नोटीसमध्ये म्हटलं आहे. या शोचे निर्माते आणि कपिल शर्मा यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
