AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिकच्या पूर्व पत्नीसोबत ब्रेकअप का केलं? बऱ्याच वर्षांनंतर अली गोणीने सोडलं मौन

क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या आधी मॉडेल नताशा स्टँकोविक ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता अली गोणीला डेट करत होती. या दोघांनी एकत्र एका शोमध्येही भाग घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अलीने ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.

हार्दिकच्या पूर्व पत्नीसोबत ब्रेकअप का केलं? बऱ्याच वर्षांनंतर अली गोणीने सोडलं मौन
नताशा स्टँकोविक, अली गोणी, हार्दिक पांड्याImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2024 | 9:46 AM
Share

मॉडेल नताशा स्टँकोविकने क्रिकेटर हार्दिक पांड्याला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर ती मुलासोबत तिच्या मायदेशी निघून गेली. मात्र सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून तिथून विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतेय. हार्दिकसोबतच्या घटस्फोटानंतर नताशाचे भूतकाळातील रिलेशनशिपसुद्धा चर्चेत आले आहेत. हार्दिकच्या आधी ती टीव्ही अभिनेता अली गोणीला डेट करत होती. या दोघांनी ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. या नात्यावर आणि ब्रेकअपवर अखेर अलीने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नताशासोबतच्या नात्याबद्दल अली मोकळेपणे व्यक्त झाला.

अली गोणीने कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत दोघांनी अलीला त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. अली सध्या अभिनेत्री जास्मीन भसीनला डेट करतोय. तिच्यासोबतच्या नात्याविषयी तो म्हणाला, “जास्मीन आणि तिच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत माझं खूप चांगलं नातं आहे. ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवते. तिच्या कुटुंबात लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती प्रत्येकाची आवडती आहे.”

यावेळी अली त्याच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल म्हणाला, “जास्मीनच्या आधी माझं नातं फार काळ यासाठी टिकू शकलं नव्हतं कारण तिच्या मागण्या खूप होत्या. तिच्या मागण्यांना मी स्वीकारू करू शकलो नाही. तिने अट ठेवली होती की लग्नानंतर ती माझ्या कुटुंबीयांसोबत राहणार नाही आणि मला कोणत्याही परिस्थितीत कुटुंबीयांना सोडायचं नव्हतं. म्हणूनच आमचं नातं टिकू शकलं नाही.” यावेळी अलीने स्पष्टपणे नताशाचं नाव घेतलं नाही, पण तो तिच्याचबद्दल बोलत होता, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण जास्मीनच्या आधी अली नताशालाच डेट करत होता. “मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही. मी त्यांच्यासोबतच राहतोय आणि यापुढेही राहणार आहे. या जगातील कोणतीही शक्ती मला त्यांच्यापासून वेगळं करू शकत नाही”, असंही त्याने स्पष्ट केलं.

‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनमध्ये जास्मिन आणि अली गोणी हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करू लागले. एका मुलाखतीत अलीने जास्मिनसोबतच्या लग्नाची हिंटसुद्धा दिली होती. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत अलीला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “आई म्हणतेय की आता लग्न कर. जास्मिन लग्नासाठी तयार आहे. मीसुद्धा तयार आहे. कदाचित तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी कळेल.”

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!