AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमिताभ बच्चन अस्वस्थ; खास व्यक्तीच्या आठवणीने व्याकूळ, म्हणाले..

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारसुद्धा भावूक आहेत. 'केबीसी 17'मध्ये अमिताभ बच्चनसुद्धा धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाले.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमिताभ बच्चन अस्वस्थ; खास व्यक्तीच्या आठवणीने व्याकूळ, म्हणाले..
Amitabh BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2026 | 12:36 PM
Share

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा ‘इक्कीस’ हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. चाहत्यांसाठी तर हा क्षण भावनिक आहेच. परंतु चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि धर्मेंद्र यांचे जवळचे मित्र यांच्यासाठीसुद्धा हा क्षण अत्यंत खास आहे. आपले खास मित्र धर्मेंद्र यांच्या आठवणीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे डोळे भरून आले. ‘कौन बनेगा करोडपती 17’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबत ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी त्यांनी सांगितलं.

‘केबीसी 17’च्या सेटवर ‘इक्कीस’ या चित्रपटातील कलाकार पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. अगस्त्य हा बिग बींचा नातू आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाचा तो मुलगा आहे. या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. केबीसीच्या या खास एपिसोडची सुरुवात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. यावेळी त्यांच्याबद्दल बोलताना बिग बींचे डोळे पाणावले होते. त्यांचा आवाज थरथरत होता.

“इक्कीस हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आपल्या सर्वांसाठीचा शेवटचा मौल्यवाना स्मृतिचिन्ह आहे. लाखो चाहत्यांसाठी त्यांनी हे स्मृतिचिन्ह सोडलं आहे. आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. माझे मित्र, माझे कुटुंबीय आणि माझे आदर्श श्री. धर्मेंद्र देओल यांनी हेच केलं. धरमजी हे फक्त एक व्यक्ती नव्हते, ती एक भावना होती आणि ती भावना कधीही सोडली जाऊ शकत नाही. ती एक आठवण बनून कायम तुमच्यासोबत आशीर्वाद म्हणून राहील आणि तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

View this post on Instagram

A post shared by @sonytvofficial

यावेळी ‘शोले’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगताना बिग बी पुढे म्हणाले, “आम्ही बंगळुरूमध्ये शूटिंग करत होतो. धर्मेंद्र यांच्याकडे प्रचंड शारीरिक ताकद होती. ते नायकच नव्हे तर कुस्तीगीरही होते. मी त्यांच्या शारीरिक ताकदीची उदाहरणं पाहिली होती. चित्रपटातील त्यांच्या मृत्यूच्या दृश्यात तुम्ही पडद्यावर पाहिलेली वेदना खरी होती. कारण त्यांनी मला इतकं घट्ट धरलं होतं की वेदना आपोआप माझ्या अभिनयात प्रतिबिंबित होत होत्या. तिथे माझा अभिनय नैसर्गिक होता.”

‘इक्कीस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनीही धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की त्यांनी माझ्या चित्रपटात काम केलं. त्यांचा अभिनय खूपच उत्तम होता.” तर धर्मेंद्र यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मीसुद्धा स्वत:ला नशीबवान समजतो, अशी भावना अभिनेता जयदीप अहलावतने व्यक्त केली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं