AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती देश युद्धात उतरल्यानंतर महायुद्ध मानले जाईल? सर्वात महत्त्वाची अट काय?

World War Criteria: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आहेत. इराणनेही याला उत्तर देताना अनेक देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे बोलले जात आहे.

किती देश युद्धात उतरल्यानंतर महायुद्ध मानले जाईल? सर्वात महत्त्वाची अट काय?
World War CriteriaImage Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 9:57 PM
Share

मध्य पूर्वेत युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले होत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले आहे. आता इराणने दुबई, बहरीन, कुवेत आणि कतारसह अनेक देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात इतरही अनेक देश या युद्धात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार अशी अटकळ बांधली आहे. आज आपण किती देश युद्धात उतरल्यानंतर महायुद्ध सुरू होते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

एखादे युद्ध महायुद्ध कधी बनते?

एखाद्या युद्धाला महायुद्ध घोषित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खास मापदंड नाही. इतिहासकार आणि लष्करी तज्ञ वेगवेगळ्या निकषांवरून महायुद्धाची व्याख्या करतात. याचाच अर्थ महायुद्ध घोषित करण्यासाठी युद्धात सहभागी असलेल्या देशांची संख्या विचारात घेतली जात नाही. महायुद्ध हा शब्द ऐतिहासिक आहे, तो कायदेशीर नाही. जेव्हा एखाद्या युद्धात प्रमुख जागतिक शक्तींचा समावेश होतो, तेव्हा ते महायुद्ध म्हटले जाऊ शकते. जर एखाद्या युद्धात डझनभर देशांचा समावेश आहेस मात्र ते भौगोलिकदृष्ट्या मर्यादित असेल तर ते प्रादेशिक युद्ध म्हटले जाते. मात्र एखाद्या युद्धात जर मोठ्या महासत्ता आणि खंडांचा समावेश असेल तर कमी देशांचा सहभाग असलेले युद्धही महायुद्ध म्हटले जाऊ शकते.

महायुद्धाची प्रमुख अट काय आहे?

महायुद्धाची एक महत्त्वाची अट म्हणजे अमेरिका, रशिया आणि चीन सारख्या प्रमुख जागतिक शक्ती आणि नाटो सारख्या प्रमुख लष्करी ताकदीने जर थेट युद्धात सहभाग घेतला तर ते महायुद्ध म्हटले जाऊ शकते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात महत्त्वपूर्ण लष्करी शक्ती असलेल्या शक्तिशाली देशांनी थेट संघर्षात भाग घेतला होता. यानंतर हा संघर्ष संघर्ष जगभर पसरला, ज्यामुळे महायुद्धाला सुरूवात झाली.

महायुद्धाची आणखी एक परिभाषा म्हणजे भौगोलिक प्रमाण. युद्ध जर एकाच प्रदेशाच्या पलीकडे सुरू झाला आणि त्यात अनेक खंड, समुद्री मार्ग आणि हवाई क्षेत्र समाविष्ट झाले तर ते महायुद्ध म्हटले जाते. पहिल्या महायुद्धात युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेमध्ये लढाया झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात युरोप, आशिया, आफ्रिका आणि पॅसिफिकपर्यंत संघर्ष पोहोचला होता.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!

‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!.

‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं