AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी रेखाला सेटवर सर्वांसमोर जोरदार थप्पड का लगावली होती?

एकेकाळी, बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं जोडपं म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. पण यांचे नाते कटूतेने संपलं असं म्हणतात. . चित्रपटाच्या सेटवर अमिताभ यांनी रेखाला थेट थप्पड मारली, त्यानंतर रेखाने त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला.

अमिताभ बच्चन यांनी रेखाला सेटवर सर्वांसमोर जोरदार थप्पड का लगावली होती?
amitabh and rekha Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2025 | 11:43 AM
Share

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा तर आजही होतात. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे नाते एका चित्रपटाच्या सेटवर सुरू झाले. एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण अमिताभ बच्चन हे आधीच विवाहित असल्याने त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. कारण जेव्हा जया बच्चन यांना रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल समजले होते तेव्हा त्यांनी रेखाला बरंच काही सुनावलं होतं असंही म्हटलं जातं. पण एकदा अमिताभ आणि रेखा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्यांच्यातही काहीतरी घडलं आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी रेखाला सर्वांसमोर ठिकाणी थप्पड लगावली होती.

अन् रेखाला शूटिंग सेटवरच सर्वांसमोअनेक थप्पड मारल्या 

रेखा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात वेडी झाली होती. दोघांमधील नात्याची सर्वत्र चर्चा होत होती. तेव्हा अमिताभ ‘लावारीस’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी चित्रपटात बिग बींसोबत एक इराणी डान्सर देखील काम करत होती. अशा परिस्थितीत, सेटवर अफवा पसरली की बिग बी या इराणी डान्सरच्या प्रेमात आहेत. आणि ही अफवा जेव्हा रेखाच्या कानावर गेली तेव्हा तिला वाटले की अमिताभ तिला फसवत आहेत. अशा परिस्थितीत ती लगेचच चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि अमिताभ यांना खूप काही ऐकवू लागली होती. रेखाने बरंच काही ऐकवल्यानंतर अमिताभ यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी रेखाला शूटिंग सेटवरच सर्वांसमोअनेक थप्पड लगावल्या असं म्हटलं जातं. अमिताभच्या या वागण्याने रेखाला धक्का बसला होता आणि ती जोरजोरात रडू लागली.

जया बच्चन यांना अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील नात्याबद्दल कळले तेव्हा

यानंतर रेखा अमिताभ यांच्यावर रागावली आणि तिने ‘सिलसिला’ चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. ‘सिलसिला’चे निर्माते रेखाच्या निर्णयावर खूप नाराज होते. चित्रपटासाठी त्यांनी अमिताभ आणि जया बच्चन यांना कास्ट केले होते. जेव्हा जया बच्चन यांना अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी एक युक्ती खेळली. जेव्हा अमिताभ बच्चन घरी नव्हते, तेव्हा जयाने रेखाला जेवणासाठी आमंत्रित केले आणि त्यांच्यात एक संवाद झाला त्यात त्यात ते रेखाला थेट म्हणाल्या की मी अमितला कधीही सोडणार नाही. जयाकडून हे ऐकल्यानंतर रेखाला समजले होते की ती आणि अमिताभ कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत. त्यानंतर रेखा बिग बींपासून दूर झाली.

पण आजही त्यांच्या अफेअरच्या चर्चा होतात. तसेच रेखा अजूनही अमिताभ यांच्यावर प्रेम करते आणि त्यांच्या नावाचे मंगळसुत्र आणि सिंदूर लावते असं म्हटलं जातं.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.