AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोडीतरी लाज बाळगा..; अमिताभ बच्चन यांच्या त्या 13 ट्विट्समुळे भडकले नेटकरी

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर चाहते खूपच नाराज झाले आहेत. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 13 ट्विट्स केले आहेत. या ट्विट्समुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

थोडीतरी लाज बाळगा..; अमिताभ बच्चन यांच्या त्या 13 ट्विट्समुळे भडकले नेटकरी
Amitabh BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: May 09, 2025 | 2:02 PM
Share

सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं सर्वांत प्रभावी माध्यम मानलं जातं. एखादी घटना घडली की सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत असंख्य जण त्यावर मोकळेपणे व्यक्त होतात, कधी प्रश्न उपस्थित करतात तर कधी जाब विचारतात. परंतु याच सोशल मीडियावर एखाद्या अत्यंत मोठ्या विषयावरून कोणी फक्त मौन बाळगत असेल तर त्यावरून चाहत्यांनी चिडणं स्वाभाविकच आहे. सध्या अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत असंच काहीसं घडतंय. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारे बिग बी हे सध्या देशभरात सुरू असलेल्या मोठ्या घडामोडींबाबत केवळ ब्लँक पोस्ट लिहित आहेत. यामुळे चाहते त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर बिग बी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फक्त ब्लँक पोस्ट लिहित आहेत.

22 एप्रिल रोजी त्यांचं शेवटचं असं ट्विट होतं, ज्यामध्ये मजकूर लिहिलेला होता. त्यानंतर ते दररोज फक्त पोस्टमध्ये ट्विटचा आकडा लिहित आहेत. त्यापुढे ते काहीच म्हणत नाहीयेत. गेल्या तेरा दिवसांपासून बिग बी असेच ट्विट रोज करत आहेत. त्यामुळे त्यांना नेमकं काय बोलायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पहलगाम हल्ल्याच्या 14 दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतावर हवाई हल्ले सुरू आहेत. देशभरात तणावाचं वातावरण असताना, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना बिग बी मात्र एक्स अकाऊंटवर फक्त ब्लँक पोस्ट लिहित आहेत.

त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे कसे महानायक.. महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतच नाहीत’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे मूक ड्रील कधीपर्यंत सुरू राहणार’, असा उपरोधिक सवाल दुसऱ्याने केला. ‘आता तरी काही बोला’, अशीही विनंती अनेकांनी बिग बींना केली आहे. ‘पहलगाम हल्ल्यावर संपूर्ण देश व्यक्त होत असताना, हळहळ व्यक्त करताना तुम्ही किमान दोन शब्द लिहू शकत नाही का’, असा संतप्त प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. आता बिग बींची ही मूक मालिका कधीपर्यंत सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.