AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anant-Radhika wedding : अनंतच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत 40 दिवसांचा भंडारा, रोज किती हजार लोक जेवतात?

Anant-Radhika wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंट यांच्या लग्न सोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्नाच्या निमित्ताने एक भव्य-दिव्य सोहळा, अंबानी कुटुंबाची श्रीमंती दिसतेय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला सेवा भावनेतून अनेक चांगले सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आलेत. मुंबईत 40 दिवसांचा भंडारा हे सुद्धा त्यापैकीच एक आहे.

Anant-Radhika wedding : अनंतच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत 40 दिवसांचा भंडारा, रोज किती हजार लोक जेवतात?
Anant Radhika wedding
| Updated on: Jul 12, 2024 | 3:25 PM
Share

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच आज लग्न आहे. अनंत अंबानी राधिका मर्चेंट सोबत विवाहबद्ध होणार आहेत. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे हे लग्न होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंबात या लग्न सोहळ्याच सेलिब्रेशन सुरु आहे. विविध सेलिब्रिटी, बॉलिवूड कलाकार, नामवंत व्यक्ती या कार्यक्रमांमध्ये सहभाही झाल्या. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्नाच्या निमित्ताने एक भव्य-दिव्य सोहळा, अंबानी कुटुंबाची श्रीमंती दिसतेय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला सेवा भावनेतून अनेक चांगले सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आलेत.

अंबानी कुटुंबाची परोपकार, सेवा भावनेतून अनेक कार्य सुरु असतात. अनंत-राधिकाच्या लग्नाआधी 50 जोडप्यांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्याला स्त्रीधन म्हणून अनंत यांची आई नीता अंबानी यांनी वधूंना 1 लाख रुपये आणि दागिने दिले. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दररोज किती हजार लोक जेवायचे?

लग्नाच्या निमित्ताने अनंत अंबानी यांनी मुंबईत 40 दिवस भंडारा आयोजित केला होता. या भंडाऱ्यामुळे दररोज 9000 लोकांची जेवणाची व्यवस्था झाली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून भंडाऱ्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. म्हणजे हा भंडारा 5 जूनला सुरु झाला. सर्वांसाठी हा भंडारा खुला होता. दररोज दोनवेळ तीन ते चार हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

लग्नासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले

इथे जेवायला येणाऱ्या लोकांनी अनंत अंबानी यांना लग्नासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले,असं या भंडाऱ्याच्या सुपरवायजरने सांगितलं. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण अनंत अंबानी यांचं भरभरुन कौतुक करतायत. व्हेज पुलाव, ढोकळा, पुरी, पनीर, रायता असे पदार्थ जेवणामध्ये आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.