AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anant-Radhika wedding : अनंतच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत 40 दिवसांचा भंडारा, रोज किती हजार लोक जेवतात?

Anant-Radhika wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंट यांच्या लग्न सोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्नाच्या निमित्ताने एक भव्य-दिव्य सोहळा, अंबानी कुटुंबाची श्रीमंती दिसतेय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला सेवा भावनेतून अनेक चांगले सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आलेत. मुंबईत 40 दिवसांचा भंडारा हे सुद्धा त्यापैकीच एक आहे.

Anant-Radhika wedding : अनंतच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत 40 दिवसांचा भंडारा, रोज किती हजार लोक जेवतात?
Anant Radhika wedding
| Updated on: Jul 12, 2024 | 3:25 PM
Share

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच आज लग्न आहे. अनंत अंबानी राधिका मर्चेंट सोबत विवाहबद्ध होणार आहेत. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे हे लग्न होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंबात या लग्न सोहळ्याच सेलिब्रेशन सुरु आहे. विविध सेलिब्रिटी, बॉलिवूड कलाकार, नामवंत व्यक्ती या कार्यक्रमांमध्ये सहभाही झाल्या. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्नाच्या निमित्ताने एक भव्य-दिव्य सोहळा, अंबानी कुटुंबाची श्रीमंती दिसतेय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला सेवा भावनेतून अनेक चांगले सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आलेत.

अंबानी कुटुंबाची परोपकार, सेवा भावनेतून अनेक कार्य सुरु असतात. अनंत-राधिकाच्या लग्नाआधी 50 जोडप्यांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्याला स्त्रीधन म्हणून अनंत यांची आई नीता अंबानी यांनी वधूंना 1 लाख रुपये आणि दागिने दिले. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दररोज किती हजार लोक जेवायचे?

लग्नाच्या निमित्ताने अनंत अंबानी यांनी मुंबईत 40 दिवस भंडारा आयोजित केला होता. या भंडाऱ्यामुळे दररोज 9000 लोकांची जेवणाची व्यवस्था झाली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून भंडाऱ्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. म्हणजे हा भंडारा 5 जूनला सुरु झाला. सर्वांसाठी हा भंडारा खुला होता. दररोज दोनवेळ तीन ते चार हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

लग्नासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले

इथे जेवायला येणाऱ्या लोकांनी अनंत अंबानी यांना लग्नासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले,असं या भंडाऱ्याच्या सुपरवायजरने सांगितलं. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण अनंत अंबानी यांचं भरभरुन कौतुक करतायत. व्हेज पुलाव, ढोकळा, पुरी, पनीर, रायता असे पदार्थ जेवणामध्ये आहेत.

Follow Us
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!
'मविआ'ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग...
'मविआ'ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग सुरूच...
20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आंदोलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!
Abhijit Dipke | 20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आंदोलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!
राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष...
राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष घेणार हा निर्णय, विधानाची जोरदार चर्चा
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरणेंचं उत्तर
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दत्ता भरणेंचं उत्तर वादात
ज्यांनी देशातलं सोनं...देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर..
ज्यांनी देशातलं सोनं...देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर सडकून टीका!
नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले..
Sharad Pawar | नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले...
शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार,
Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय?
शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन!
Solapur | 130 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन! 17 दिवसांपासून सुरु होतं उपोषण