AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आश्रम’मधला खलनायक ‘भोपा स्वामी’चे महाकुंभ स्नान; म्हणाला “सर्व देवाच्या इच्छेने…”

'आश्रम' सीरिजमधले 'भोपा स्वामी' साकारलेला अभिनेत्यानेही महाकुंभाला भेट देत स्नान केलं. यावेळी त्याने अनेक गोष्टींबद्दलचे त्याचे अनुभव सागंतिले. तसेच त्यांनी आपल्या धार्मिक विश्वासाबद्दलही बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

'आश्रम'मधला खलनायक 'भोपा स्वामी'चे महाकुंभ स्नान; म्हणाला सर्व देवाच्या इच्छेने...
| Updated on: Feb 22, 2025 | 7:47 PM
Share

‘आश्रम’ या वेब सीरीजचा नवीन भाग आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या भागात आता काय नवीन पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शिवाय या सीरिजमधील सर्व कॅरेक्टरची तेवढीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. यातील एक कॅरेक्टर म्हणजे बॉबी देओलच्या मित्राची भूमिका साकारणारा चंदन रॉय सन्याल. चंदनने सीरिजमध्ये ‘भोपा स्वामी’ची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या नवीन सीझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘आश्रम’मधील भोपाने केलं महाकुंभ स्नान

याच दरम्यान अभिनेता चंदन रॉयने अलीकडेच महाकुंभाला भेट दिली आणि तेथे पवित्र स्नान केलं. चंदनने सांगितलं की तो एका कार्यक्रमासाठी लखनौमध्ये होता, तेव्हा आयोजकांनी त्याला महाकुंभाला येण्याचं आमंत्रण दिलं. हे सर्व देवाच्या इच्छेने घडले आहे असं त्याचं मत आहे. तो म्हणाला की, “या सर्व गोष्टी स्वतःहून घडतात. मला फोन आला म्हणून मी इथे आलो. मी 10 फेब्रुवारी रोजी इथे आलो आणि पाच दिवस राहिलो.”

” मला भाग्य लाभलं म्हणून मी…”

दरम्यान चंदनने महाकुंभातील त्याचा अनुभवही सांगितला तो म्हणाला, “तिथे लाखो लोक होते आणि मला भाग्य लाभले आहे, म्हणून मी विमानाने विमानतळावर पोहोचलो आणि माझे हॉटेल घाटाच्या जवळ होते. मी लाखो लोकांना रस्त्यावरून चालताना पाहिलंय, त्यांच्या मुलांना खांद्यावर घेऊन रस्ता काढताना पाहिलंय. त्यामुळे लोकांचा किती विश्वास आहे हे यावरून दिसून येते.”

महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल शोक व्यक्त केला.

अलीकडेच महाकुंभात चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 30 लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा चंदनला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने याबद्दल दुःख व्यक्त केलं. तो म्हणाला, “हे खूप दुःखद आणि धक्कादायक आहे. इतक्या लोकांनी आपले प्राण गमावले, इतक्या कुटुंबांनी आपले उपजीविका साधन गमावले. मी या दुर्दैवाची कल्पनाही करू शकत नाही. तथापि, इतक्या मोठ्या अपघातानंतरही, मला इथे येण्याबद्दल शंका नव्हती.”

अध्यात्माशी खोल संबंध 

चंदन हा एका धार्मिक कुटुंबातील आहे आणि म्हणूनच त्याचे विश्वासही धार्मिक आहेत. अभिनेता म्हणाला, “माझी आई खूप धार्मिक आहे आणि माझे वडीलही असेच होते. मी माझ्या आईसाठी गंगाजलही घेतले आहे. मी लहान असताना, माझी आई मला दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा मंदिरात घेऊन जायची. गेल्या काही वर्षांत, मला धर्माबद्दल खोलवर ओढ निर्माण झाली आहे. मी मोठा होत गेलो तसतसे मी परमहंस योगानंद यांचे चरित्र वाचले आणि मी आध्यात्मिक झालो. मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो आणि त्यांचा आदर करतो. पण कुठेतरी एक दैवी शक्ती आहे, ज्याच्यामुळे सर्व काही घडते.” असं म्हणत त्याने अध्यात्मावर असलेल्या त्याच्या विश्वासाबद्दल सांगितलं.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.