AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Protests: बांगलादेशसोडून शेख हसीना भारतात दाखल, मुस्लीम देशाबद्दल कंगनाचं मोठं वक्तव्य

Bangladesh Protests: फक्त 45 मिनिटांत स्वतःची मायभूमी सोडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल, कंगना रनौत म्हणाल्या, 'मुस्लीम देशांमध्ये आता...', बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर देशातील जनता रस्त्यावर उतरली...

Bangladesh Protests:  बांगलादेशसोडून शेख हसीना भारतात दाखल, मुस्लीम देशाबद्दल कंगनाचं मोठं वक्तव्य
| Updated on: Aug 06, 2024 | 8:54 AM
Share

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सध्या बांगलादेशमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. अशात पंतप्रधानांना आपल्याच देशातून पलायन करावं लागलं आहे. शेख हसीना यांना अवघ्या 45 मिनिटात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. बांगलादेशमध्ये जाळपोळ सुरु असताना शेख हसीना भारतात दाखल झाल्या आहेत. याचदरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी मुस्लीम देश आणि भारताबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या, ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे…’ असं कंगना म्हणाल्या.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगना रनौत म्हणाल्या, ‘आपल्या सभोवतालच्या सर्व इस्लामी प्रजासत्ताकांची मूळ मातृभूमी भारत आहे. बांगलादेशच्या माननीय पंतप्रधान यांना भारतात सुरक्षित वाटत आहे, ही आमच्यासाठी सम्मानित आणि आनंद देणारी गोष्ट आहे…’

पुढे कंगना म्हणाल्या, ‘पण प्रत्येक भारतीय विचार आहे की हिंदू राष्ट्र का? राम राज्य का? आता याठिकाणी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे मुस्लीम देशांमध्ये कोणी सुरक्षित नाही…. स्वतः मुसमान देखील त्यांच्या देशात सुरक्षित नाहीत…अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण रामराज्यात राहात आहोत…’ सध्या कंगना यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झाल तर, भाजप खासदार कंगना रनौत कायम हिंदू आणि हिंदुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर परखडपणे स्वतःचं मत मांडताना दिसतात. मोदी सरकार भारतात आल्यापासून भारतात राम राज्याची स्थापना झाली… असा दावा देखील कंगना यांनी अनेकदा केला आहे. आता पुन्हा बांगलादेशामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर ‘राम राज्यात राहत असल्यामुळे आम्ही भाग्यवान अहोत…’ असं वक्तव्य कंगना यांनी केलं आहे.

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेश सोडून भारतात आल्या. शेख हसीना यांचं विमान राजधानी दिल्लीजवळील गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना काही दिवस भारतात राहतील आणि त्यानंतर त्या लंडनला रवाना होऊ शकतात… अशी माहिती समोर येत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.