AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Protests: बांगलादेशसोडून शेख हसीना भारतात दाखल, मुस्लीम देशाबद्दल कंगनाचं मोठं वक्तव्य

Bangladesh Protests: फक्त 45 मिनिटांत स्वतःची मायभूमी सोडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल, कंगना रनौत म्हणाल्या, 'मुस्लीम देशांमध्ये आता...', बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर देशातील जनता रस्त्यावर उतरली...

Bangladesh Protests:  बांगलादेशसोडून शेख हसीना भारतात दाखल, मुस्लीम देशाबद्दल कंगनाचं मोठं वक्तव्य
| Updated on: Aug 06, 2024 | 8:54 AM
Share

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सध्या बांगलादेशमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. अशात पंतप्रधानांना आपल्याच देशातून पलायन करावं लागलं आहे. शेख हसीना यांना अवघ्या 45 मिनिटात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. बांगलादेशमध्ये जाळपोळ सुरु असताना शेख हसीना भारतात दाखल झाल्या आहेत. याचदरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी मुस्लीम देश आणि भारताबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या, ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे…’ असं कंगना म्हणाल्या.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगना रनौत म्हणाल्या, ‘आपल्या सभोवतालच्या सर्व इस्लामी प्रजासत्ताकांची मूळ मातृभूमी भारत आहे. बांगलादेशच्या माननीय पंतप्रधान यांना भारतात सुरक्षित वाटत आहे, ही आमच्यासाठी सम्मानित आणि आनंद देणारी गोष्ट आहे…’

पुढे कंगना म्हणाल्या, ‘पण प्रत्येक भारतीय विचार आहे की हिंदू राष्ट्र का? राम राज्य का? आता याठिकाणी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे मुस्लीम देशांमध्ये कोणी सुरक्षित नाही…. स्वतः मुसमान देखील त्यांच्या देशात सुरक्षित नाहीत…अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण रामराज्यात राहात आहोत…’ सध्या कंगना यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झाल तर, भाजप खासदार कंगना रनौत कायम हिंदू आणि हिंदुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर परखडपणे स्वतःचं मत मांडताना दिसतात. मोदी सरकार भारतात आल्यापासून भारतात राम राज्याची स्थापना झाली… असा दावा देखील कंगना यांनी अनेकदा केला आहे. आता पुन्हा बांगलादेशामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर ‘राम राज्यात राहत असल्यामुळे आम्ही भाग्यवान अहोत…’ असं वक्तव्य कंगना यांनी केलं आहे.

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेश सोडून भारतात आल्या. शेख हसीना यांचं विमान राजधानी दिल्लीजवळील गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना काही दिवस भारतात राहतील आणि त्यानंतर त्या लंडनला रवाना होऊ शकतात… अशी माहिती समोर येत आहे.

Follow Us
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?