AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!

1981 मध्ये संजय दत्तने 'रॉकी' चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या तीन दिवस अगोदर संजूचे मातृछत्र हरपले होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देणार्‍या अभिनेत्री नर्गिस यांनी 1981मध्ये या जगाचा निरोप घेतला होता.

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!
नर्गिस आणि संजय दत्त
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 4:25 PM
Share

मुंबई : एका आईसाठी तिची सर्व मुले समान असतात, परंतु तरीही असे म्हणतात की मुलगे हे त्यांच्या आईच्या जास्त जवळ असतात. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि त्याची आई नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांच्यातही असेच संबंध होते. 1981 मध्ये संजय दत्तने ‘रॉकी’ चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या तीन दिवस अगोदर संजूचे मातृछत्र हरपले होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देणार्‍या अभिनेत्री नर्गिस यांनी 1981मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. पण जाण्यापूर्वी त्यांनी संजय दत्तसाठी खूप काही सांगणारा, अर्थपूर्ण संदेश रेकॉर्ड केला होता. लेक संजय दत्तसाठी नर्गिसचा हा शेवटचा संदेश होता (Bollywood Actor Sanjay Dutt share emotional post for mother Nargis on her birth anniversary).

अनेकदा चित्रपटातील व्यक्तिरेखांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच काही काळापूर्वी संजय दत्तचा एक जुना व्हिडीओही बराच चर्चेत आला होता, ज्यामध्ये तो आपल्या आईच्या शेवटच्या मेसेजबद्दल बोलला होता. या व्हिडीओमध्ये संजय म्हणाला होता की, त्याची आई नर्गिस यांचे निधन झाले तेव्हा तो अजिबात रडला नाही. परंतु, जेव्हा त्याने त्याच्या आईच्या शेवटच्या मेसेजची टेप ऐकली, तेव्हा तो 4 ते 5 तास धायमोकलून रडला.

आई नर्गिसचा संजय दत्तसाठी अखेरचा निरोप

यासिर उस्मान यांनी संजय दत्तवर लिहिलेल्या ‘Sanjay Dutt: The Crazy Untold Story of Bollywood’s Bad Boy’ पुस्तकातही या घटनेचा उल्लेख केला आहे. यामध्ये संजय दत्तने सांगितले होते की, नर्गिसच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर त्याच्या मित्राने त्याला नर्गिस यांची ही टेप ऐकवली होती. ती ऐकून संजय दत्त खूप भावूक झाला होता. आईचे शेवटचे शब्द ऐकून तो स्वत:ला रडण्यापासून रोखूच शकला नाही, असे तो म्हणाला (Bollywood Actor Sanjay Dutt share emotional post for mother Nargis on her birth anniversary).

संजय दत्त ज्या ऑडिओ टेपबद्दल बोलत होता त्यात नर्गिस यांनी संजयला आपला शेवटचा निरोप सांगितला होता, तो असा की, ‘संजू, कुठल्याही इतर गोष्टीपेक्षा, तुझी नम्रता कायम ठेव. आपले चरित्र चांगले ठेवा. कधीही दिखावा करू नको. नेहमी नम्र राहा आणि नेहमीच वडीलधाऱ्यांचा आदर कर. हीच गोष्ट तुला खूप पुढे घेऊन जाईल आणि तीच तुला आपल्या कामात बळ देईल.’

आईच्या वाढदिवशी संजय दत्तची भावनिक पोस्ट

आज (1 जून) नर्गिस यांची जयंती आहे. या खास प्रसंगी संजय दत्तने आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या ट्विटरवर संजय दत्तने आई नर्गिससोबत आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुझ्यासारखे कोणीही नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई…’

(Bollywood Actor Sanjay Dutt share emotional post for mother Nargis on her birth anniversary)

हेही वाचा :

Dhanush Jagame Thandhiram trailer | चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय धनुषचा गँगस्टर लूक, पाहा ‘जगमे थंदीरम’चा जबरदस्त ट्रेलर

Photo : ‘सकारात्मक ऊर्जेसाठी योगा उत्तम…’,अमृता खानविलकरचा फिटनेस मंत्रा

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....