AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ती आत्महत्या नाही तर..” सुशांतच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचा चकीत करणारा दावा

आमिर खानचा भाऊ फैजल खान याने सुशांतच्या मृत्यूबाबत धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. फैजलने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे.

ती आत्महत्या नाही तर.. सुशांतच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचा चकीत करणारा दावा
Faisal Khan and SushantImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 1:43 PM
Share

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सुशांतच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही त्याच्या मृत्यूशी संबंधित रहस्य उलगडलेलं नाही. सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे. सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते वेळोवेळी त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत. आता नुकताच अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) भाऊ फैजल खान (Faisal Khan) याने सुशांतच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

आमिर खानच्या भावाचा धक्कादायक खुलासा

आमिर खानचा भाऊ फैजल खान याने सुशांतच्या मृत्यूबाबत धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. फैजलने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे.

“मला माहीत आहे की सुशांतची हत्या झाली होती. आता याचा उलगडा होतो की नाही हे येणारा काळच सांगू शकेल. अनेक एजन्सी या कामात गुंतले आहेत आणि त्याचा तपास करत आहेत’, असं तो एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

“सत्य लवकरच बाहेर येईल. अनेकदा सत्य समोर येत नाही. पण मी प्रार्थना करेन की सत्य लवकरच सर्वांसमोर येऊ दे आणि सर्वांना त्याबद्दल कळू दे,” असंही तो म्हणाला.

घराणेशाहीवर व्यक्त केलं मत

या मुलाखतीत फैजलने केवळ सुशांतबद्दलच नाही तर बॉलिवूडबद्दल बरंच काही सांगितलं. बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या अस्तित्वाबद्दल त्याने स्पष्ट मत मांडलं. इंडस्ट्रीत हिरोची चांगली इमेज नसल्याबद्दलही तो बोलला. आमिरचा भाऊ फैजल याने ‘मेला’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. मात्र त्यानंतर तो कधीही मोठ्या पडद्यावर दिसला नाही.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.