सिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल

ज्या जनतेने तिकीट खरेदी करुन प्रेक्षकाची भूमिका पार पाडली, या आणि अशा अनेक लोकांनी सिनेसृष्टीची निर्मिती केली, असं कंगना म्हणाली.

सिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Sep 15, 2020 | 8:09 PM

मुंबई : ड्रामा क्वीन कंगना रनौतने पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या करण जोहरवर टीका केली आहे. सिनेसृष्टीची निर्मिती करण जोहर किंवा त्याच्या बापाने केली नाही, असा घणाघात कंगनाने केला आहे. समाजवादी पक्षाचे मीडिया समन्वयक मनिष अग्रवालने केलेल्या ट्विटला प्रत्युतर देताना कंगनाने हे ट्विट केलं आहे. (Cineworld was not made by karan johar or his father)

कंगना काय म्हणाली ?

सिनेसृष्टी फक्त करण जोहर किंवा त्याच्या बापाने बनवली नाही. दादासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार, कर्मचाऱ्यांनी, सैनिकांनी ज्यांनी सीमेचं रक्षण केलं, ज्या नेत्याने संविधानाचं रक्षण केलं, ज्या जनतेने तिकीट खरेदी करुन प्रेक्षकाची भूमिका पार पाडली, या आणि अशा अनेक लोकांनी सिनेसृष्टीची निर्मिती केली, असं कंगना म्हणाली.

“तुम्ही संघर्षाला कमी लेखून सर्वांवर टीका करुन प्रगती करु इच्छिता का ? असा सवाल मनिष अग्रवालने कंगनाला विचारला होता. करण जोहर असो किंवा अन्य फिल्मनिर्माते, सर्वांच्या मेहनतीमुळेच सिनेसृष्टी उभी आहे. कोणतंही क्षेत्र हे सर्वांना अपशब्द वापरुन 1-2 दिवसात उभं राहत नाही,” असं ट्विट मनीष अग्रवालने केलं होतं.

कंगनाने मंगळवारी सकाळी जया बच्चन यांचा राज्यसभेतील व्हिडिओ ट्विट करत टीका केली होती. सपा खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत मंगळवारी शून्य प्रहारादरम्यान खासदार रवीकिशन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. रवीकिशन यांच्यावर केलेल्या टीकेवरुन कंगनाने जया बच्चन यांचा समाचार घेतला.

करण जोहर सिनेमाफिया – कंगना

काही दिवसांपूर्वी कंगनाने करण जोहरवर ट्विट करत टीका केली होती. “करण जोहर हा सिनेमाफियाचा मुख्य सूत्रधार आहे. करन जोहरने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. यानंतरही करण जोहर बिनबोभाट फिरतोय. करणवर कोणतीही कारवाई केली जात नाही. आमच्या सारख्यांना याठिकाणी संधी आहे का? “, असा सवाल कंगनाने ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन केला होता.

स्टार किड्सना प्रोत्साहन

सुशांत सिंह प्रकरणानंतर कंगनाने आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत वक्तव्य करण्यास सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये फक्त सिने-अभिनेत्यांच्या मुलांनाच प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप केला होता.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर कंगना रनौतने आक्रमक पवित्रा घेतला. कंगनाने करण जोहर, महेश भट्ट आणि आदित्य चोप्रासह अनेकांवर आरोप केला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेनिर्माते आणि प्रोडक्शन हाऊसनी सुशांतचं करियर धुळीस मिळवलं. सुशांतला काम करण्याची संधी दिली नाही. तसेच संधी हिरावून घेतल्याचा आरोपही कंगनाने केला होता.

संबंधित बातम्या 

जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट 

कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल 

कंगना भाजपची कठपुतली, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा भाग : सचिन सावंत 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.