AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट

'अशोक मा.मा' या प्रसिद्ध मालिकेत आता नवे वळण आले आहे. भैरवीचा प्लान यशस्वी झाला आहे. पण त्यामुळे अशोक मा.मा यांच्या आयुष्यात नवे वादळ आले आहे.

Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, 'अशोक मा.मां'च्या आयुष्यात मोठे संकट
Ashok mamaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2025 | 12:42 PM
Share

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेष मन जिंकताना दिसते. या मालिकेत अभिनेते अशोक सराफ हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मुलगा आणि सूनेच्या निधनानंतर अशोक माजगावकर हे तीनही नातवंडांचा सांभाळ करताना दिसत आहे. त्यासाठी त्यांची नोकरीमध्ये सुरु असलेली धडपड दाखवण्यात आली आहे. दरम्यान, मुलांची मावशी भैरवी सतत काही ना काही नवे डाव आखताना दिसत आहे.

‘अशोक मा.मा’ मालिकेत भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघोड्या सुरूच आहेत. त्यात अनिश आणि भैरवीने अचानक लग्न केल्याने मामांना मोठा धक्का बसला आहे. भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता. त्यात आता या लग्नामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशोक मामा आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना, हे नवीन वादळ त्यांच्यासाठी अजून एक मोठं संकट ठरणार असे चित्र दिसत आहे.

अशोक मामा यांचा मित्र परशूरामाने काही दिवसांपूर्वीच भैरवीविषयी संशय व्यक्त केला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. फुलराणीने परशुराम आणि भैरवीचे फोटो काढून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. त्याच वेळी संयमीने घरात खोटं बोलून विश्वासघात केल्याचंही उघड झालं. पण या सगळ्याचा कळस म्हणजे अनिशने भैरवीसोबत लग्न करून आल्याची बातमी असणारा आहे. मामांनी आधीच घर विकण्याचा विचार सुरू केला होता, आणि आता भैरवी घरात आली, तर परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता आहे. भैरवीच्या उपस्थितीमुळे कुटुंबात फूट पडणार का? अनिशच्या या निर्णयाने तो स्वतः अडचणीत सापडणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अशोर मा.मा आता भैरवी आणि अनिशला घरात घेणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अनिशच्या निर्णयामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. त्याच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेत भैरवी कुटुंबावर वर्चस्व मिळवणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या रविवारी होणाऱ्या महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत.

भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.