AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra | ‘तो’ सीन शूट करताना मला… शबाना आझमींसोबतच्या ‘त्या’ सीनबद्दल धर्मेंद्र यांनी सोडले मौन

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्यामध्ये अभिनेते धर्मेंद्र यांचा एक लिपलॉक सीनही आहे.

Dharmendra | 'तो' सीन शूट करताना मला... शबाना आझमींसोबतच्या 'त्या' सीनबद्दल धर्मेंद्र यांनी सोडले मौन
| Updated on: Jul 29, 2023 | 6:11 PM
Share

Dharmendra Reaction : करण जोहर (Karan Johar) याच्या दिग्दर्शनखाली बनलेला रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपच 28 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यासह धर्मेंद्र (Dharmendra), शबाना आझमी (Shabana Azmi), जया बच्चन (Jaya Bachchan) यांचीही मुख्य भूमिका आहे. मात्र या चित्रपटातील एक सीन पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक किसींग सीन आहे. मात्र त्यावर बरेच लोक टीका करत आहेत. आता यावर धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातील आलिया भट्ट व रणवीर सिंग यांच्या केमिस्ट्रीसोबतच धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्या कामाचेही खूप कौतुक झाले आहे. चित्रपटात धर्मेंद्र अनेक वर्षांनी शबाना आझमी यांना भेटतात तेव्हा गाणं म्हणतात व त्यांना किस करतात. याच दृश्यावर आता धर्मेंद्र यांनी मौन सोडले आहे.

काय म्हणाले धर्मेंद्र ?

एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी किसींग सीनबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘ चित्रपटातील माझ्या व शबाना यांच्या किसींग सीनमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे असं मी ऐकलं, ‘ असं धर्मेंद्र म्हणाले. त्यांनी या सीनचे कौतुक केले. मला वाटतं लोकांना याची कल्पना नव्हती, आणि तो सीन अचानक समोर आल्याने त्याचा मोठा प्रभाव पडला. यापूर्वी मी ‘ लाईफ इन ए मेट्रो ‘ चित्रपटात नफीसा अली यांना शेवटचं किस केलं होतं आणि त्या सीनच बरंच कौतुक झालं होतं, असं ते म्हणाले.

धर्मेंद्र यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा करणने (जोहर) आम्हाला हा सीन ऐकवला तेव्हा मला ते एक्स्पेक्टेड नव्हतं. मात्र आम्ही तो (सीन) समजून घेतला आणि त्यानंतर आम्हाला वाटल की हा सीन असा आहे ज्याची चित्रपटात आवश्यकता, गरज आहे. तो काही जबरदस्ती किंवा उगाचच टाकायचा म्हणून मध्येच टाकलेला सीन नाही, मग मी म्हटलं की हो, मी हा सीन करेन.

वय हा फक्त एक आकडा !

मला असंही वाटत की रोमान्स करण्याचं काही (ठराविक) वय नसतं. वय हा तर फक्त एक आकडा आहे. आणि त्याचा वयाचा विचार न करता, त्याची काळजी न करता दोन लोकं किस करून एकमेकांप्रती असलेलं प्रेम दर्शवू शकतात. हा सीन करताना ना मला ना शबानाला, कोणालाही काही वेगळं किंवा अजब वाटलं नाही कारण, तो (सीन) अगदी छान पद्धतीने शूट करण्यात आला, असंही धर्मेंद्र यांनी नमूद केले.

या चित्रपटाबद्दल धर्मेंद्र म्हणाले, मला असं वाटतं की मी अजून चांगलं काम करू शकलो असतो. पण करणने एक शानदार चित्रपट बनवला आहे, तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. मी त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम केलं पण मला खूप आनंद वाटला. सगळ्याच कलाकारांच काम छान झालंय. रणवीर, आलिया हे दोघेही अगदी सहज अभिनय करतात. चित्रपटात शबाना यांचं काम मस्त झालं आणि जया (बच्चन) यांचही, तिला मी नेहमी गुड्डी म्हणतो. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे लोक तो थिएटरमध्ये जाऊन पाहतील आणि आमच्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करतील, अशी आशाही धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.