AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामा गोविंदासोबत कृष्णाने मिटवला 7 वर्षांचा वाद; पण मामी अजूनही नाराज? शोमध्येच मागितली माफी

अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद जगजाहीर आहे. गेल्या सात वर्षांपासून या दोघांनी अबोला धरला होता. अखेर सात वर्षांनंतर त्यांच्यातील वाद मिटला आहे. यावेळी कृष्णाने मामीची जाहीर माफीसुद्धा मागितली.

मामा गोविंदासोबत कृष्णाने मिटवला 7 वर्षांचा वाद; पण मामी अजूनही नाराज? शोमध्येच मागितली माफी
Govinda with wife Sunita Ahuja and Krushna AbhishekImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2025 | 3:15 PM
Share

अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद तब्बल सात वर्षांनंतर मिटला आहे. वाद मिटल्यानंतर गोविंदा कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. हा खास एपिसोड येत्या 30 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. मात्र गोविंदाशी वाद मिटले असले तरी त्यांच्या पत्नीसोबत अजूनही बोलत नसल्याचं कृष्णाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं. इतकंच काय तर जेव्हा गोविंदा कपिलच्या शोमध्ये आला, तेव्हा कृष्णाने मंचावरूनच मामीची जाहीर माफीसुद्धा मागितली.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणाला, “बऱ्याच काळानंतर मला इतका चांगला अनुभव आला. मी स्टेजवरच म्हणालो की माझा सात वर्षांचा वनवास संपला आहे. आम्ही आता एकत्र आहोत. आम्ही नाचलो, हसलो आणि खूप मजा केली.” काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. तेव्हा कृष्णा त्याची भेट घेऊ शकला नव्हता. याविषयी तो पुढे म्हणाला, “मामाच्या पायाला दुखापत झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यावेळी मी सिडनीमध्ये होतो आणि मी माझ्या आयोजकांनाही शो रद्द करण्याची विनंती केली होती. पण माझी पत्नी कश्मिरा इथे होती आणि सर्वांत आधी तिनेच रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी गोविंदा मामासुद्धा तिच्याशी खूप चांगलं वागले. रक्ताच्या नाती या शेवटी रक्ताच्याच नाती असतात. त्यांची प्रकृतीही आता ठीक आहे आणि आता ते नाचूही शकतायत.”

यावेळी कृष्णाला मामीसोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कृष्णाने सांगितलं, “मी त्यांच्या घरी एक-दोनदा गेलो आणि त्यांची मुलगी टीनाशी बोललो. ती पण माझ्याशी खूप चांगलं वागली. आम्ही बऱ्याच काळानंतर भेटतोय असं मला वाटलंच नाही. पण मी अद्याप मामींशी बोललो नाही. पण मला खात्री आहे की त्यासुद्धा ठीक असतील. माझ्या मते त्या ठीकच आहेत, अन्यथा त्यांनी मामांना शोमध्ये पाठवलंच नसतं. कारण मामीच मामांच्या कामाचं शेड्युल सांभाळते आणि जर तिला काही समस्या असतील तर तिने मला किंवा शोला नकार दिला असता. पण तिने नकार दिला नाही. मामा जेव्हा शोमध्ये आले तेव्हा आम्ही खूप मजा केली, डान्स केला, त्यामुळे मला खात्री आहे की मामी आता 50 टक्के तरी ठीक असेल. मी शोदरम्यानही तिची माफी मागितली. कारण मामा म्हणाले की माझी नको मामीची माफी माग.”

दोघांमधील नेमका वाद काय?

कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद 2016 मध्ये सुरू झाला. त्यावेळी कृष्णाने त्याच्या शोमध्ये एक विनोद केला होता आणि गोविंदाला तो फार अपमानास्पद वाटला होता. जेव्हा कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने गोविंदावर निशाणा साधत ट्विट केलं, तेव्हा हा वाद आणखी वाढला. या वादादरम्यान सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अनेकदा दोघांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर्षी गोविंदाने भाची आरती सिंहच्या लग्नाला हजेरी लावून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोविंदाने पत्नी सुनिताने अद्याप कृष्णाशी अबोला धरला आहे.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर