AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी गोळी मारली असती तर थेट..”; गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?

अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याच्या घटनेवर आता पत्नी सुनीता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदाला गोळी लागली तेव्हा ती मुंबईत नव्हती. त्यावेळी सर्व गोष्टी कशा हाताळल्या, याविषयी सुनीता मोकळेपणे व्यक्त झाली.

मी गोळी मारली असती तर थेट..; गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?
Govinda and Sunita AhujaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2025 | 12:04 PM
Share

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अभिनेता गोविंदाच्या पायाला चुकून बंदुकीची गोळी लागली होती. त्याच्या स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली होती. गोविंदा त्याची परवानाकृत रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता, त्याचवेळी ती चुकून खाली पडली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा या घटनेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ज्यावेळी गोविंदाला गोळी लागली होती, तेव्हा सुनीता शहरात नव्हती.

‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखीतत सुनीता हसत म्हणाली, “गोविंदाने अर्धच सत्य गोष्ट सांगितली होती. मी शिल्पाला सांगितलं होतं की मी गोळी मारली असती तर पायावर नव्हे तर थेट छातीवर मारली असती. काम करायचं तर पूर्ण करायचं, अन्यथा नाहीच करायचं.” ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेव्हा गोविंदाने हजेरी लावली होती, तेव्हा अभिनेत्री शिल्पा शेट्टीने त्याला गोळी लागल्याच्या घटनेवरून मस्करीत प्रश्न विचारला होता. “गोळी चुकून लागली की पत्नी सुनीताने तुम्हाला मारली”, असं तिने मस्करीत विचारलं होतं. याचंच उत्तर सुनीताने आपल्याच अंदाजात दिलं.

त्या घटनेविषयी सुनीता पुढे म्हणाली, “मी त्यावेळी मुंबईत नव्हते आणि मुलगा यश बँकॉकमध्ये होते. मी त्याला सांगितलं नव्हतं पण मी खाटूश्यामला प्रार्थनेसाठी गेले होते. ज्यादिवशी गोविंदाच्या पायाला गोळी लागली, तेव्हा मी सकाळी ध्यानसाधना करत होते. त्याचदिवशी तो कोलकाताला दुर्गापुजेसाठी जात होता. अचानक मला माझ्या ड्राइव्हरने कॉल केला. सहसा मी ध्यानसाधना करताना फोनकॉल उचलत नाही. पण त्याने दोन वेळा फोन केल्याने मी तो फोन उचलला. कदाचित गोविंदाने त्याला फोन करायला सांगितलं असावं. ड्राइव्हरने सांगितलं तेव्हा माझा पहिला प्रश्न हाच होता की, गोळी कोणी झाडली? तेव्हा त्याने सांगितलं की, नाही.. गोविंदाकडूनच चुकून लागली.”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

“गोविंदाला गोळी लागल्याचं कळताच मी तातडीने मुंबईसाठी निघाले. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले, तेव्हासुद्धा माझा पहिला प्रश्न त्याला हाच होता की, तू स्वत:लाच मारून घेतलंस का? तेसुद्धा अशा ठिकाणी गोळी लागली. जिथे लागायला पाहिजे होती तिथे नाही लागली. तेव्हा तो म्हणाला, तू तर खुश असशील आता? तेव्हा मी मस्करीत म्हणाले की, छातीवर गोळी लागली असती तर मी जास्त खुश झाले असते (हसते”, असं तिने पुढे सांगितलं.

गोविंदाची मुलगी टिनाने त्याला रुग्णालयात नेलं होतं. सुनीता म्हणाली, “जेव्हा त्याला गोळी लागली, तेव्हा घरात ड्राइव्हर, बॉडीगार्ड आणि एक कर्मचारी होता. टिना तिच्या फ्लॅटमध्ये झोपली होती आणि गोविंदा बंगल्यात होता. मी तिला फोन करून सांगितलं तेव्हा ती तातडीने गोविंदाला घेऊन रुग्णालयात गेली. मी सतत फोनवरून अपडेट्स जाणून घेत होती.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.