AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्ता ठावूक नसतानाही लिहिलं प्रेमपत्र; परत आलेल्या त्या पत्राने गाजलं हे अजरामर गाणं !

शक्ती चित्रपटातील ‘हम ने सनम को खत लिखा’ हे गाणे आजही मनाला भिडते. पत्त्याविना प्रेमपत्र लिहिण्याच्या अनोख्या कल्पनेतून साकारलेले हे गाणे लता मंगेशकर, आनंद बक्षी आणि आर.डी. बर्मन यांच्या प्रतिभेचा सुंदर मिलाफ आहे.

पत्ता ठावूक नसतानाही लिहिलं प्रेमपत्र; परत आलेल्या त्या पत्राने गाजलं हे अजरामर गाणं !
| Updated on: Aug 26, 2026 | 5:43 PM
Share

हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील काही गाणी इतकी सुंदर, इतकी सुमुधुर आहेत की ती ऐकूनच चेहऱ्यावर हास्य येतं आणि ओठ आपोआप ते गाणं गुणगुणायला लागतात. 44 वर्षांपूर्वी आलेला ‘शक्ति’ चित्रपट खूप गाजला आमि त्यातली गाणीही. त्याचं चित्रपटातील एक खास गाणं म्हणजे, ‘हमने सनम को खत लिखा’. जुन्या जमान्यातील हे गाणं आजंही अनेक रोमँटिक लोकप्रिय गाण्यापैकू एक आहे. या गाण्यातील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यातलं प्रेम पत्र… खास अशासाठी कारण पत्र लिहीणाऱ्याला पत्ताच ठावूक नाहीये ना… लता मंगेशकरांचा सुमधुर आवाज, आनंद बक्षी यांचे सुंदर बोल आणि आर.डी. बर्मन यांनी दिलेलं कर्णधुर संगीत, यामुळे या गाण्याला चार चाँद लागले आणि ते न विसरण्याजोगं ठरतं. मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्या केमिस्ट्रीने गाणं आणखीनच सजलं आणि सुरेखरित्या पडद्यावर उमटलं.

पत्ताच नाही, तरी प्रेमपत्र !

‘हमने सनम को खत लिखा’ या गाण्याची कथा खूपच अनोखी आहे. यात प्रियकर आपल्या प्रेयसीला पत्र लिहितो, पण ते पत्र नेमक्या कोणत्या पत्त्यावर पाठवायचं, हेच त्याला माहीत नसतं. गाण्याच्या बोलांतून हीच गंमत आणि रोमँटिक गोंधळ अतिशय मजेशीर पद्धतीने मांडली आहे. पत्र पोस्टात टाकल्यानंतरही प्रतीक्षा संपत नाही आणि शेवटी ते पत्र परत येतं, कारण असा कोणताही पत्ता अस्तित्वातच नसतो. हीच गोष्ट या गाण्याला इतर प्रेमगीतांपेक्षा अगदी अनोखी, वेगळी बनवते .

लता मंगेशकर यांचे सूर अन्

या गाण्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. गाण्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले, तर संगीत आर. डी. बर्मन यांनी दिलं होतं. सुमारे 4 मिनिटं 10 सेकंदांचं हे गाणं चित्रपटात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. दोघांची साधी आणि सहज केमिस्ट्री या गाण्याचे सौंदर्य आणखी वाढवते. ‘शक्ती’ चित्रपटात ‘जाने कैसे कब कहां इकरार हो गया’ यांसारखी इतर लोकप्रिय गाणीही होती.

शक्तिची कहाणी आणि बॉक्स ऑफीस कलेक्शन

शक्ति चित्रपटाचं दिग्दर्शन हे रमेश सिप्पींनी केलं तर स्क्रीनप्ले सलीम-जावेद यांच्या जोडीने लिहीला. या चित्रपटात दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राखी, स्मिता पाटिल, कुलभूषण खरबंदा आणि अमरीश पुरी यांसारखे एकाहून एक मोठे कलाकार होते. या चित्रपटात दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा एकत्र आणि एकदाच काम केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर खूप .श मिळाल नाही, पण समीक्षकांनी चित्रपट खूप नावाजला.

Follow Us
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले