AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? धक्कादायक परिस्थिती सांगत जवेद अख्तरांचा रोखठोक सवाल... देशात हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळलेली असताना लेखक जावेत अख्तर यांनी रोखठोक प्रश्न विचारले आहे.

पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
फाईल फोटो
| Updated on: Apr 30, 2025 | 10:19 AM
Share

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक पर्यटक गंभीर जखमी देखील आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या देशात हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळलेली असताना लेखक जावेत अख्तर यांनी रोखठोक प्रश्न विचारले आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुलाखतीत पहिला प्रश्न उपस्थित करत जावेद अख्तर म्हणाले, ‘पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊ दिलं पाहिजे? यावर दोन उत्तरं आहेत. हे नातं कायम एकतर्फी राहिलं आहे. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली, नूरजहां भारतात आले. आपण त्यांचं उत्तम स्वागत केलं. फैज अहमद फैज जे महान कवी होते. ते पाकिस्तानात राहायचे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांना राष्ट्रप्रमुखासारखे वागवलं गेलं आणि सरकारने त्यांना खूप आदर दिला. ‘

लता मंगेशकर यांच्यावर जावेद अख्तर काय म्हणाले?

‘भारताना पाकिस्तानी कलाकारांचा आदर केला पण मला नाही वाटत पाकिस्तानने काधी याचं उत्तर दिलं. मला पाकिस्तानी लोकांसोबत वैर नाही. पकिस्तानातील मोठ्या कलाकारांनी लता मंगेशकर यांच्यासाठी गाणी लिहिली आहेत. 60 – 70 च्या दशकात तर लता मंगेशकर भारत आणि पाकिस्तानच्या आवडत्या गायिका होत्या पण लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम पाकिस्तानात झाला नाही…’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले.

पाकिस्तानमध्ये आपण कोणाला खूश करत आहोत?

रोखठोक सवाल उपस्थित करत जावेद अख्तर म्हणाले, ‘पाकिस्तानी लोकांची तक्रार मी कधीच करणार नाही. कारण त्या देशात देखील लता मंगेशकर यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. पण काही अडथळे होते, व्यवस्थेमध्ये काही चुका आहेत. हे नातं एकतर्फी आहे.

दुसरा प्रश्न देखली तितकाच महत्त्वाचा आहे. जर आपण पाकिस्तानी कलाकारांना ब्लॉक केले तर आपण पाकिस्तानात कोणाला खूश करत आहोत? लष्कर आणि कट्टरपंथी यांना, त्यांना हेच हवं आहे का? त्यांना फक्त दुरावा निर्माण करायचा आहे. अशाप्रकारे या दोन बाजू सांगता येतील, पण सध्याच्या काळात असे प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही. असं देखील जावेद अख्तर म्हणाले.

Follow Us
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.