AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Vs Maharashtra Government | महाराष्ट्र लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा, फोटो ट्विट करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Kangana Vs Maharashtra Government | महाराष्ट्र लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा, फोटो ट्विट करत म्हणाली...
कंगना रनौत आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 16, 2021 | 5:32 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील कंगनाच्या कार्यालयातील बरेच अनधिकृत बांधकामाची तोडफोड करण्यात आली होता. ज्यानंतर अभिनेत्री सतत उद्धव सरकारवर कडक टीका करत असते. नुकतच कंगनाने ट्विट करत महाराष्ट्रातील लॉकडाऊन बद्दल सडकून टीका केली आहे (Kangana Ranaut  Vs Maharashtra Government on Lockdown).

काहीवेळा पूर्वीच कंगना रनौतने ट्विटवर एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरपासून बंद आहे. परंतु, हा दरवाजा सर्व बाजूंनी खुला आहे. हा दरवाजाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असा आहे”. ज्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे.

‘महाराष्ट्रात कोरोनाचे प्रकरण वाढतच चालले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लादला आहे. जिथे या संपूर्ण लॉकडाऊनला राज्यात अतिशय मिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. बरेच लोक त्याचे योग्यरित्या अनुसरण करत आहेत, तर काही लोक अजूनही रस्त्यावर फिरत आहेत.

पाहा कंगना रनौतचे ट्विट

 (Kangana Ranaut  Vs Maharashtra Government on Lockdown)

याआधीही कंगनाची टीका

अभिनेत्री कंगना रनौतने गेल्या वर्षी देखील महाराष्ट्राची तुलना पीओकेशी केली होती. ज्यानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांनीही कंगनाच्या वागण्याला चुकीचे म्हटले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने कंगनाच्या विरोधात मोर्चा बांधला होता. महाराष्ट्र सरकारचे खासदार संजय राऊत देखील कंगनावर नाराज होते. यानंतर बीएमसीने कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामाची तोडफोड केली होती. या सर्वांच्या दरम्यान कंगनाने या लढाईत केंद्र सरकारकडून स्वतःसाठी सुरक्षिततेची मागणी केली आणि तिलाही ही सुरक्षा मिळाली.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने केली होती टीका

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 5 एप्रिल रोजी राजीनामा दिला होता. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी आता आपला राजीनामा सादर केला होता. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली होती. अशा परिस्थितीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana Ranaut) हिने अनिल देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला होता.

(Kangana Ranaut  Vs Maharashtra Government on Lockdown)

हेही वाचा :

Kartik Aaryan | करण जोहरशी पंगा, ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यनला दाखवला बाहेरचा रस्ता!

Indian Idol 12 | छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार ‘म्युझिकल रामायण’, मोहम्मद दानिश गाणार हनुमान चालीसा!

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.