AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक -करिश्माची लव्हस्टोरी कशी झाली सुरू ? बहिणीमुळे वाढली जवळीक पण…

अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तर अभिषेक बच्चन हाही नेहमी चर्चेत असतो. बच्चन आणि कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात. करिश्मा आणि अभिषेक यांचं नातंही नेहमीच चर्चेत होतं.

अभिषेक -करिश्माची लव्हस्टोरी कशी झाली सुरू ? बहिणीमुळे वाढली जवळीक पण...
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 9:43 AM

अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तर अभिषेक बच्चन हाही नेहमी चर्चेत असतो. बच्चन आणि कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात. करिश्मा आणि अभिषेक यांचं नातंही नेहमीच चर्चेत होतं. आता जरी अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न झालं असलं तरी एक काळ असा होता जेव्हा अभिषेक हा करिश्मा कपूरवर निस्सीम प्रेम करायचा. दोघांचं ब्रेकअप कधी झालं, काझालं याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत आहे. त्यावेळी बरीच चर्चाही झाली होती. पण मुळात हे दोघे कसे भेटले, त्यांचं नात कसं सुरू झालं हे फार कमी लोकांना माहीत असेल.

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि अनेक व्हायरल व्हिडिओ त्याची साक्ष देतात. पण हे दोघे पहिल्यांदा कसे भेटले आणि त्यांचे प्रेम कसे फुलले हे तुम्हाला माहीत आहे का ? या दोघांची जवळीक बहिणीमुळे वाढली. निखिल नंदा हे अमिताभ बच्चन यांची लाडकी श्वेता नंदा हिचे पती आहेत. ते कपूर कुटुंबातील मुलगी, राज कपूर यांची लेक रितू नंदा यांचा मोठा मुलगा. 1997 साली त्यांचं नात ठरलं. त्यानंतर बच्चन कुटुंब आणि कपूर कुटुंब एकमेकांच्या खूप जवळ आले.त्याचवेळी करिश्मा आणि अभिषेक बच्चन पहिल्यांदा एकमेकांना भेटले.

कशी वाढली जवळीक ?

हे सुद्धा वाचा

श्वेता बच्चन हिच्यामुळे अभिषेक आणि करिश्मा यांची जवळीक वाढली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दोघांची पहिले मैत्री झाली आणि जसजसा वेळ पुढे गेला तसं त्याचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यानंतर बच्चन-कपूर कुटुंबानेही हे नात स्वीकारलं आणि एका सोहळ्यात अमिताभ बच्चन यांनी दोघांच्या साखरपुड्याची घोषणा देखील केली होती. तेव्हा बच्चन कुटुंबाची होणारी सून म्हणून करिश्मा खूपच लाजली होती.

का तुटलं नातं ?

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे कुटुंबीय या नात्यामुळे खूश होते. अमिताभ बच्चन यांनाही करिश्मा कपूर आवडली, त्यांची होणारी सून म्हणून करिश्माची ओळख होती. त्यानंतर अभिषेक -करीश्माचा साखरपुडाही झाला. पण मध्येच माशी शिंकली आणि लग्नाआधीच 2002 मध्ये करिश्मा आणि अभिषेकची एंगेजमेंट तुटली. साखपुडा मोडल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. बबिता यांच्या एका अटीमुळे त्या दोघांचं हे नातं तुटलं असं म्हटलं जातं. त्यामुळेच दोघांचही लग्न होऊ शकलं नाही.

खरंतर त्या दोघांचं नातं ठरलं तेव्हा करिश्मा ही मोठी स्टार होती, तर अभिषेक हा चित्रपटसृष्टीत जम बसवत होता, तो फारसा सेटल झालेला नव्हता. त्यामुळे करिश्माची आई, बबिता यांना तो जावई म्हणून पसंत नव्हता. म्हणूनच अखेर करिश्मा आणि अभिषेकचं नात मोडलं. आणि नंतर अवघ्या काही महिन्यांतच तिने 2003 साली बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर करिश्मा कपूर चित्रपटांपासून दूर राहिली. तर अभिषेकनेही 2007 साली ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न केले, त्यांना आराध्या नावाची एक गोड मुलगी देखील आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.