AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाभारता’तील दुर्योधनाचा 36 वर्षांत इतका बदलला लूक; एका घटनेनं बदललं होतं आयुष्य

पुनीत यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातही भूमिका साकारली होती. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पुनीत यांनी 'चंद्रमुखी', 'प्रेम शक्ती', 'राम जाने', 'बॉर्डर', 'रेफ्युजी', 'क्रिश', 'रेडी', 'सन ऑफ सरदार', 'बचना ऐ हसीनों' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

'महाभारता'तील दुर्योधनाचा 36 वर्षांत इतका बदलला लूक; एका घटनेनं बदललं होतं आयुष्य
Mahabharat actorsImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2024 | 12:32 PM
Share

बी. आर. चोप्रा यांनी 1988 मध्ये ‘महाभारत’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. या मालिकेने आणि त्यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. प्रेक्षक आपापली कामं सोडून टीव्हीसमोर ही मालिका बघण्यासाठी आतूर असायचे. ‘महाभारत’ या मालिकेत अभिनेते पुनीत इस्सार यांनी दुर्योधनाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्यांचा प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र नंतर जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना काम मिळणं कठीण झालं होतं. आता 36 वर्षांनंतर पुनीत यांचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. दुर्योधनाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेले पुनीत इस्सार हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

पुनीत यांनी ‘महाभारत’ या मालिकेत काम करण्याआधी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटातील एका ॲक्शन सीनदरम्यान पुनीत यांना अमिताभ बच्चन यांना एक मुक्का मारायचा होता. त्यांनी हा मुक्का इतक्या जोरात मारला होता की बिग बींची हालतच खराब झाली होती. पुनीत यांना हा सीन करणं फार महागात पडलं होतं. त्यानंतर त्यांना काम मिळणंही बंद झालं होतं. बऱ्याच अडचणींनंतर त्यांना ‘महाभारत’ या मालिकेत भूमिका मिळाली होती. या मालिकेनंतर त्यांचं करिअर पुन्हा मार्गावर आलं होतं. त्यांनी साकारलेली दुर्योधनाची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती.

अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता पुनीत इस्सार यांनी मनमोहन देसाई यांच्या 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेतून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका 1988 पासून 1990 पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यांची दुर्योधनाची भूमिका इतकी गाजली होती की खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना तसंच समजत होते. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ‘महाभारत’ मालिका सुरू असताना एका मारवाडी बिझनेसमनने सर्वांना जेवायला बोलावलं होतं. मात्र त्यावेळी पुनीत यांना जेवणच दिलं गेलं नव्हतं. तुम्ही पांडवांवर इतका अत्याचार का करता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. इतकंच नव्हे तर मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली या जेव्हा पुनीत यांच्याशी बोलू लागल्या, तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत उभं न राहण्याचाही सल्ला दिला गेला होता.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.