Manoj Bajpayee | मनोज बाजपेयींनी 14 वर्षांपासून केलं नाही डिनर; असं करण्यामागचं कारण काय?

सुरुवातीला हे रुटीन फॉलो करणं खूप कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच भूक मिटवण्यासाठी ते पाणी प्यायचे आणि बिस्किट खायचे. मनोज बाजपेयीच्या मते या रुटीनमुळे त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच मोठा बदल झाला.

Manoj Bajpayee | मनोज बाजपेयींनी 14 वर्षांपासून केलं नाही डिनर; असं करण्यामागचं कारण काय?
Manoj BajpayeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 5:38 PM

मुंबई : आपल्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या डाएटविषयी महत्त्वाचा खुलासा केला. गेल्या 14 वर्षांपासून त्यांनी रात्रीचं जेवण केलंच नाही. रात्री काहीच खात नसल्याचं त्यांनी सांगितलं. मनोज बाजपेयी हे त्यांच्या आरोग्यासाठी असं करतात. सर्वसाधारणपणे लोक फिट राहण्यासाठी व्यायाम आणि योग करतात, जिमला जातात आणि तिन्ही वेळा योग्य डाएट फॉलो करतात. मात्र मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या रुटीनमधून डिनरला पूर्णपणे काढून टाकलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी डिनर करणं का सोडून दिलं, याविषयीचा खुलासा केला.

अशी झाली सुरुवात

“या गोष्टीला 13-14 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी विचार केला की माझे आजोबा माझ्यापेक्षाही बारिक होते पण ते नेहमीच फिट असायचे. मी सुद्धा त्यांचं रुटीन फॉलो करून पाहतो, असं ठरवलं होतं. त्यांच्यासारखा दिनक्रम पाळू लागलो तेव्हा माझं वजन नियंत्रणात आलं होतं. मी दिवसभर उत्साही असायचो आणि मला फार निरोगी वाटायचं. तेव्हा मी ठरवलं की आता आयुष्यभर मी हाच नियम पाळणार”, असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“दुपारच्या जेवणानंतर किचनमध्ये काहीच बनत नाही”

मनोज बाजपेयीने पुढे म्हटलं, “मी कधी 12 तास तर कधी 14 तास उपवास करून पाहिलं. हळूहळू मी रात्रीचं जेवण बंद केलं. दुपारच्या जेवणानंतर किचनमध्ये काहीच बनायचं नाही. जेव्हा आमची मुलगी हॉस्टेलमधून घरी येते, तेव्हाच दुपारनंतर जेवण बनवलं जातं.”

सुरुवातीला हे रुटीन फॉलो करणं खूप कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच भूक मिटवण्यासाठी ते पाणी प्यायचे आणि बिस्किट खायचे. मनोज बाजपेयीच्या मते या रुटीनमुळे त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच मोठा बदल झाला. याच कारणामुळे मला कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीज नाही, असं तो सांगतो.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.