AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रभूदेवाला डेट करताना इंडस्ट्री का सोडली? अखेर नयनताराकडून खुलासा

नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं रिलेशनशिप त्यावेळी खूप चर्चेत होतं. प्रभूदेवासाठी नयनताराने धर्मांतर केल्याचंही म्हटलं जातं. एका मुलाखतीत नयनताराने प्रभूदेवाला डेट करताना इंडस्ट्री सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं.

प्रभूदेवाला डेट करताना इंडस्ट्री का सोडली? अखेर नयनताराकडून खुलासा
Nayanthara and PrabhudevaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 15, 2024 | 11:39 AM
Share

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा पडद्यावरील तिच्या पॉवरफुल भूमिकांमुळे ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाते. 2011 मध्ये इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या दोन वर्षांनंतर तिने दमदार कमबॅक केलं होतं. तेव्हा तिला ही नवी ओळख मिळाली होती. नयनताराने आता दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्याशी लग्न केलं असून त्यांना दोन जुळी मुलं आहेत. नयनताराच्या आयुष्यात विग्नेश येण्याआधी ती कोरिओग्राफर, डान्सर आणि दिग्दर्शक प्रभूदेवाला डेट करत होती. प्रभूदेवाच्या प्रेमापोटीच तिने त्यावेळी अभिनय क्षेत्रातील करिअर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा नयनताराने केला आहे.

‘द हॉलिवूड रिपोर्टर’ला दिलेल्या मुलाखतीत नयनतारा म्हणाली, “मी अशा टप्प्यावर होती जिथे मला वाटलं की जर माझ्या आयुष्यात मला प्रेम हवं असेल तर काही त्यागसुद्धा करावा लागेल. त्यावेळी मी खूप संवेदनशील आणि तरुण होती. आमच्या इंडस्ट्रीत मी बरेच रिलेशनशिप्स पाहिले आहेत. मी त्यांना वाईट म्हणत नाहीये पण हे अशाच पद्धतीने चालत असल्याचं आम्ही पाहिलंय. त्यामुळे त्यावेळी मला वाटलं की ठीक आहे. माझ्या आतील प्रामाणिक मुलीला असं वाटलं होतं की जर तुला प्रेम हवं असेल तर कुठेतरी तडजोड करावीच लागेल. तुला तुझं सर्वकाही द्यावं लागेल. जर तुमच्या जोडीदारा तुम्ही करत असलेली एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही त्याचा त्याग केला पाहिजे. त्यावेळी प्रेम म्हणजे माझा असा समज होता.”

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

प्रभूदेवासोबतच्या नात्यामुळे नयनताराने जरी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला असला तरी त्या नात्यामुळे माझं भलंच झालं, अशी भावना नयनताराने यावेळी व्यक्त केली. “आज मी ज्याठिकाणी आहे, ते त्याच रिलेशनशिपमुळे आहे. जर ते नातं नसतं, तर मला इथपर्यंत पोहोचायची ताकद मिळाली नसती असं वाटतं. माझ्यात नेमकी किती क्षमता आहे, हे मला समजलं नसतं. त्या नात्यानंतर मी आता पूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे”, अशी कबुली नयनताराने दिली.

“सिनेमा हा फक्त व्यवसाय नाही हे मला समजलं. हे फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही. पण ही एक अशी गोष्ट आहे, जी माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनली आहे. मी हेच करण्यासाठी जन्मले आहे. अखेरचा जेव्हा मी ‘श्री राम राज्यम’ हा चित्रपट केला, तेव्हा मला जाणवलं की मी चित्रपटांपासून दूर राहूच शकत नाही”, असं नयनताराने स्पष्ट केलं. 2011 मध्ये नयनताराने इंडस्ट्री सोडली होती. नंतर तेव्हा तिचं आणि प्रभूदेवाचं ब्रेकअप झालं, तेव्हा 2013 मध्ये तिने कमबॅक केलं. विग्नेश शिवनला भेटल्यानंतर नयनताराची प्रेमाबद्दलची संकल्पना पूर्णपणे बदलली. आयुष्यात योग्य व्यक्ती आली की सर्वकाही ठीक होतं, असं ती म्हणाली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.