AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सूर्यवंशम’ सिनेमातील छोट्या भानूप्रतापला ओळखणं कठीण, 25 वर्षांत भन्नाट ट्रांसफॉर्मेशन

'सूर्यवंशम' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराल आता ओळखणं देखील कठीण, 25 वर्षांत त्याच्यातील भन्नाट ट्रांसफॉर्मेशन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'सूर्यवंशम' सिनेमातील बालकलाकाराची चर्चा... फोटो पाहिल्यानंतर म्हणाल...

'सूर्यवंशम' सिनेमातील छोट्या भानूप्रतापला ओळखणं कठीण, 25 वर्षांत भन्नाट ट्रांसफॉर्मेशन
| Updated on: Mar 08, 2024 | 12:11 PM
Share

मुंबई | 8 मार्च 2024 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज देखील बिग बी यांचे अनेक सिनेमे चाहते तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने पुन्हा पाहातात. अमिताभ बच्चन यांच्या हीट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘सूर्यवंशम’… सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली आहे. पण सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना चाहते अद्यापही विसरु शकलेले नाहीत. सिनेतान अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराला ओळखणं देखील आता कठीण झालं आहे.

भानू प्रताप सिंह म्हणजे आमिताभ बच्चन यांचा नातू आणि मुलाच्या भूमिकेत बालकलाकाराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वतःच्या संस्कारांनी चाहत्यांचं मन जिंकलं. चिमुकल्या मुलाने फक्त चाहत्यांना नाहीतर, सिनेमात कठोर दिसणाऱ्या भानू प्रताप सिंह यांना देखील स्वतःच्या प्रेमात पाडलं.

सांगायंच झालं तर, ‘सूर्यवंशम’ सिनेमा प्रदर्शित होऊन 25 वर्ष झाली आहेत आणि सिनेमातील छुटकू आता तरुण झाला आहे. 25 वर्षांमधील त्याचं भन्नाट ट्रांसफॉर्मेशन पाहून तुम्हाला देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमातील चिमुकल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्याच्या लहानपणाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर, अभिनेता आनंद वर्धन आहे. आनंद वर्धन याने फार लहान असताना अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सांगायचं झालं तर, आनंद वर्धन याचे आजोबा पीबी श्रीनिवास हे प्रसिद्ध गायक होते.

आजोबा प्रसिद्ध गायक असल्यामुळे आनंद यांचं अनेक सेलिब्रिटींच्या घरी येणं – जाणं होतं. अशात अनेकांनी आनंद याचा गोंडसपणा सर्वांना आवडायचा. म्हणून त्याला सिनेमांमध्ये काम देखील मिळू लागलं होतं. आनंद वर्धन याने वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी सिनेमात काम करायला सुरुवात केली. त्याने बालकलाकार म्हणून जवळपास 25 सिनेमांमध्ये काम केलं. आनंद वर्धन याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा नंदी पुरस्कारही मिळाला आहे.

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर आनंद वर्धन याने अभिनयाचा निरोप घेतला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आनंद याने अभिनय करणं सोडलं. आनंद वर्धन याने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आनंद वर्धन याच्या लूकची चर्चा रंगली आहे. आनंद वर्धन आता 33 वर्षांचा आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंद सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आनंद लवकरच एका तेलगू सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून दिसणार असल्याची चर्चा आहे.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.