AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 11 वर्षांनंतर सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; चाहत्यांना बसला धक्का!

गेल्या 11 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका अखेर बंद होणार आहे. ही मालिका कोणती आणि त्याचा शेवटचा एपिसोड कधी प्रसारित होईल, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या..

तब्बल 11 वर्षांनंतर सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; चाहत्यांना बसला धक्का!
Pranali RathodImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 07, 2025 | 9:50 AM
Share

छोट्या पडद्यावरील काही मालिकांना प्रेक्षकांकडून अनेक वर्षांपासून भरभरून प्रेम मिळालं. काही मालिका अवघ्या काही महिन्यांतच आपला गाशा गुंडाळतात, तर काही मालिका वर्षानुवर्षे टिकून राहतात. अशीच एक मालिका गेल्या 11 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. परंतु आता या लोकप्रिय मालिकेचाही प्रवास संपुष्टात आला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. झी टीव्हीवरील या लोकप्रिय मालिकेचं नाव आहे ‘कुमकुम भाग्य’. गेल्या काही महिन्यांपासून सतत या मालिकेचा टीआरपी अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे ‘कुमकुम भाग्य’मधील चौथ्या पिढीची कथा प्रेक्षकांना आवडली नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

बंद होणार मालिका?

ही मालिका 2004 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष छाप सोडली आहे. सुरुवातीला अभिनेत्री श्रुती झा आणि शब्बीर आहलुवालिया यांच्या मुख्य भूमिका होत्या. या दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री आणि मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडले. बऱ्याच वर्षांपर्यंत ही मालिका टीआरपीच्या यादीत टॉप 5 मध्ये होती. परंतु गेल्या काही वर्षांत यातील बरेच कलाकार बदलले आणि त्यानुसार मालिकेच्या कथेचा ट्रॅकसुद्धा बदलला. श्रुती आणि शब्बीर आता या मालिकेत नाहीत. शिवाय कथेच बरेच लीपसुद्धा आले. सध्या प्रणाली राठोड, अक्षय बिंद्रा आणि नमिक पॉल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका पुढच्या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय.

IWMBUZZ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कुमकुम भाग्य’च्या टीआरपीमध्ये सतत घसरण पहायला मिळतेय. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड 7 सप्टेंबर 2025 रोजी प्रसारित होईल. त्यामुळे या मालिकेच्या 11 वर्षांच्या प्रवासाला सप्टेंबर महिन्यात पूर्णविराम लागणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला ही मालिका बंद करण्याचा प्लॅन नव्हता. जेव्हा निर्मात्यांनी संध्याकाळी 7 वाजताची वेळ या मालिकेला दिली, तेव्हा एकता कपूरने त्याचा स्वीकार करण्याऐवजी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. आता ‘कुमकुम भाग्य’च्या वेळेत ‘गंगा माई की बेटियाँ’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूरने बुलबुलची भूमिका साकारली होती. तिलाही त्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि आता मृणाल मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी करत आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.