AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा यांचं मोठं वक्तव्य, ‘मी तिघांसोबत लग्न केलंय, म्हणून…’, चाहत्यांमध्ये खळबळ

Rekha Love Life: मी तिघांसोबत लग्न केलंय, म्हणून..., पहिल्या लग्नानंतर 7 महिन्यात रेखा यांच्या नवऱ्यानं संपवलं आयुष्य, सत्य हैराण करणारं, रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

रेखा यांचं मोठं वक्तव्य, 'मी तिघांसोबत लग्न केलंय, म्हणून...', चाहत्यांमध्ये खळबळ
| Updated on: Aug 18, 2024 | 10:33 AM
Share

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आज अभिनय विश्वात सक्रिय नसल्या तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. रेखा वयाच्या 69 व्या वर्षी देखील एकट्या राहातात. पण एक काळ असा होता जेव्हा रेखा यांच्या मागे चाहत्यांची रांग लागलेली असायची. रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.

रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती असं कोणीही नाही. पण बिग बी तेव्हा विवाहीत होते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासाठी प्रेमाचा त्याग केला. रेखा यांनी अनेकदा प्रेम व्यक्त केलं. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं नाही.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रेखा यांनी करोडपती उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर फार काळ दोघे एकत्र राहिले नाहीत. 1990 मध्ये मुकेश आणि रेखा यांचं लग्न झालं. पण लग्नाच्या सात महिन्यात रेखा यांच्या पतीने स्वतःला संपवलं. रिपोर्टनुसार, लग्नाच्या तीन महिन्यात रेखा यांनी मुकेश यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण पतीच्या निधनानंतर रेखा यांनी अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागला.

अविवाहित असताना विवाहित महिलेसारखं आयुष्य जगतात रेखा…

भारतीय संस्कृतीमध्ये पतीच्या निधनानंतर सिंदुर लावत नाहीत. पण कोणत्याही कार्यक्रमात रेखा यांच्या सिंदुरकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. यावर एका मुलाखतीत रेखा यांनी मोठं वक्तव्य देखील केलं होतं. शिवाय दुसऱ्या लग्नाबद्दल देखील रेखा म्हणाल्या होत्या…. ‘मुकेश यांचं निधन झालं आहे, आता दुसऱ्या लग्नाचा काय विचार आहे?’ यावर रेखा यांनी लक्षवेधी उत्तर दिलं.

रेखा म्हणाल्या, ‘कोणत्या पुरुषासोबत तर दुसरं लग्न कधीच करणार नाही… पती शिवाय मी तीन गोष्टींसोबत लग्न केलं आहे. मी स्वतःसोबत, मझ्या कामासोबत आणि माझ्या चाहत्यांसोबत मनात लग्न केलं आहे. मी विवाहित आहे… लग्नासाठी कोणत्या पुरुषाची गरज नाही. प्रत्येक महिला स्वतःचं रक्षण करु शकते…’ असं देखील रेखा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?