AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कदाचित माझी वेळ वाईट सुरू, पण लक्षात ठेवा..”, ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावर काय म्हणाला समय रैना?

रणवीर अलाहबादियाच्या अश्लील टिप्पणीमुळे 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो वादात सापडला आहे. या शोचा कर्ताधर्ता समय रैना सध्या परदेशात असून तिथे लाइव्ह शोज करत आहे. अशाच एका शोमध्ये तो भावूक झाला आणि त्याने वादावर प्रतिक्रिया दिली.

कदाचित माझी वेळ वाईट सुरू, पण लक्षात ठेवा.., 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादावर काय म्हणाला समय रैना?
Samay RainaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 19, 2025 | 12:59 PM
Share

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. या शोचा कर्ताधर्ता कॉमेडियन समय रैना, रणवीर अलाहबादिया आणि इतर परीक्षकांविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. सध्या समय रैना त्याच्या शोजमुळे परदेशात आहे. कॅनडामधील एडमंटनमधील मायर होरोविट्झ थिएटरमध्ये त्याचा लाइव्ह शो पार पडला. या शोला उपस्थित राहिलेल्या एका चाहत्याने सोशल मीडियावर समयबद्दल पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर समयनेही शोवरून सुरू असलेल्या वादावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली.

शुभम दत्ता नावाच्या एका चाहत्याने फेसबुकवर समयच्या शोबद्दल पोस्ट लिहिली आहे. यात त्याने त्याचा अनुभव सांगितला आहे. ‘द शो मस्ट गो ऑन.. समय रैनाचा शो पाहिल्यानंतर अखेर मला या वाक्याचा खरा अर्थ समजला आहे. या शोला आजच्या पिढीतील ज्यांना ‘बिघडलेले’ म्हटलं जातं, असे जवळपास सातशे सदस्य उपस्थित होते. ते बेंबीच्या देठापासून समयच्या नावाची घोषणा करत होते. या सर्वांसमोर उभा राहिलेल्या समय रैनाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं’, असं त्याने लिहिलं.

समय रैनाने त्याच्या शोची सुरुवात प्रेक्षकांचे आभार मानत केली. याविषयी शुभमने लिहिलं, ‘प्रचंड मानसिक दबावाखाली असलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, थकलेला चेहरा, काळ्या रंगाची हुडी घालून आलेला 25 वर्षांचा तो मुलगा प्रेक्षकांसमोर आला आणि त्याने माइकमध्ये सर्वांत आधी म्हटलं, माझ्या वकिलाची फी भरल्याबद्दल धन्यवाद.’ जेव्हा शो सुरू होतो, तेव्हा प्रेक्षकांमधील एक तरुण समयबद्दल विनोद करतो. तेव्हा रणवीर अलाहबादियाच्या वादाचा संदर्भ देऊन समय त्याला त्याच्याच अंदाजात प्रत्युत्तर देतो.

“या शोमध्ये अशा बऱ्याच संधी येतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप काही हास्यास्पद बोलू शकतो. पण तेव्हा ‘बीअर बायसेप्स’ला (रणवीर अलाहबादिया) आठवा भावांनो”, असं समय म्हणतो. रणवीरच्या अश्लील टिप्पणीमुळे समय आणि त्याच्या शोविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. देशभरात यावरून मोठा वाद सुरू असतानाही समयने दोन तासांपर्यंत प्रेक्षकांना हसवल्याबद्दल चाहत्याने त्याच्या पोस्टमध्ये खूप कौतुक केलं आहे.

‘आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक काळातून जात असतानाही या माणसाने त्याच्या कॉमेडिने प्रेक्षकांना दोन तासांपर्यंत हसवलं. त्यानंतर शो संपताना तो म्हणाला, “शायद समय खराब चल रहा है मेरा, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ”, (कदाचित माझी वेळ वाईट सुरू आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, मीच वेळ आहे.)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.