AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्याबाबत जया बच्चन यांनी पुढाकार घेतलेला तेव्हा…भन्साळी यांचा मोठा खुलासा

Salman Khan - Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांसाठी जया बच्चन यांनी घेतलेला मोठा निर्णय... संजय लिला भन्साळी यांनी केला मोठा खुलासा...

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्याबाबत जया बच्चन यांनी पुढाकार घेतलेला तेव्हा...भन्साळी यांचा मोठा खुलासा
Sanjay leela Bhansali
| Updated on: Jan 03, 2026 | 8:53 AM
Share

Salman Khan – Aishwarya Rai : संजय लिला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांनी अनेक सिनेमे बॉलिवूडला दिलेले आहेत, त्यामधीलच एक सिनेमा म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam )… 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी (Salman Khan Aishwarya Rai Film ) साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमात अभिनेता अजय देवगण याची फार मोठी भुमिका नव्हती… अशात सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान अशा एक घटना घडली, ज्यामुळे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांना मोठा प्रश्न पडला…

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तेव्हा नक्की झालं तरी काय होतं. सिनेमाच्या स्क्रिनिंगनंतर जय बच्चन यांनी भन्साळी यांना अशी प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे जया बच्चन यांनी सिनेमा आवडला नसावा… असं त्यांना वाटलं… याबद्दल भन्साळी यांनी मोठं वक्तव्य केलं आणि सलमान आणि ऐश्वर्या स्टारर सिनेमासाठी जया बच्चन यांनी उचललेल्या मोठ्या पाऊलाबद्दल सांगितलं.

‘हम दिल दे चुके सनम’ हीट झाला.. याचं श्रेय भन्साळी यांनी तीन लोकांना दिलं. त्यामध्ये एक होत्या जया बच्चन… भन्साळी म्हणाले, ‘स्क्रिनिंग संपल्यानंतर प्रत्येकाने माझ्या सिनेमाचं कौतुक केलं. पण यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं हसल्या आणि निघून गेल्या… त्यामुळे मला असं वाटलं की त्यांनी सिनेमा आवडला नाही…’

‘काही दिवसांनंतर मला एक फोन आला तो फोन जया बच्चन यांचा होता. त्या मला म्हणाल्या, तुम्हाला असं वाटलं की मला सिनेमा आवडला नाही. पण मला सिनेमा प्रचंड आवडला आहे आणि बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये मी सिनेमासाठी शिफारस करेल…मला सिनेमा आवडला आहे हे सांगण्यासाठी मी थोडा वेगळा मार्ग निवडला…’ असं संजय लिला भन्साळी एका मुलाखतीत म्हणाले. त्यांनी बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी सिनेमाची शिफारस केली आणि सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला का नाही याची खात्री केली.

हे सुद्धा वाचा – 30 व्या वर्षापर्यंत 3 लग्न… दोन नवरे हिंदू तर एक मुस्लीम… मुलगा सुपरस्टार तरीही आज एकटीच आयुष्य जगतेय अभिनेत्री

अभिनेता सलमान खान – अभिनेत्री ऐश्वर्या राय

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम बहरलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण सलमान आणि ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अत्यंत वाईट पद्धतील दोघांच्या नात्याचा अतं झाला.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.