AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातं तुटल्यानंतरही पूर्व सुनेकडून खान कुटुंबाचं कौतुक; म्हणाली “संकटाच्या वेळी ते..”

अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या वडिलांना गमावल्यानंतर संपूर्ण खान कुटुंब तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सोहैल खानच्या पूर्वी पत्नीने खान कुटुंबाचं तोंडभरून कौतुक केलं. कोणतंही संकट आलं तर ते खंबीरपणे पाठिशी उभे राहतात, असं ती म्हणाली.

नातं तुटल्यानंतरही पूर्व सुनेकडून खान कुटुंबाचं कौतुक; म्हणाली संकटाच्या वेळी ते..
Salman Khan and Malaika AroraImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2024 | 8:17 AM
Share

अभिनेत्री मलायका अरोराने गेल्या महिन्यात तिच्या वडिलांना गमावलं होतं. मलायकाचे वडील अनिल मेहता यांनी इमारतीवरून उडी मारून स्वत:चा जीव संपवला होता. या कठीण काळात मलायकाचा पूर्व पती अरबाज खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब मलायकाच्या पाठिशी खंबीरपणे उभं होतं. खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. इतकंच काय तर अभिनेता सलमान खानसुद्धा मलायकाच्या भेटीला पोहोचला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, खान कुटुंबाची पूर्व सून आणि सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहने यावर प्रतिक्रिया दिली आहे. कठीण काळात ज्याप्रकारे खान कुटुंब मलायकासोबत उभं होतं, त्याचं तिने तोंडभरून कौतुक केलं आहे. सीमा आणि सोहैल यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. तर मलायका आणि अरबाजसुद्धा काही वर्षांपूर्वी विभक्त झाले.

मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर खान कुटुंबाने तिची ज्याप्रकारे साथ दिली, त्याविषयी बोलताना सीमा म्हणाली, “ते एखाद्या खडकासारखे खंबीर आहेत. जेव्हा एखादं संकट येतं किंवा तुम्हाला कोणतीही गरज असेल तेव्हा ते सर्वजण तुमच्या पाठिशी उभे राहतील. त्यांचा हाच गुण त्यांना एक कुटुंब म्हणून खास बनवतं.” सीमासुद्धा मलायकाचं सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. अरबाज खान सर्वांत आधी मलायकाच्या भेटीला पोहोचला होता. त्याचंही नेटकऱ्यांनी कौतुक केलं होतं. अरबाजसोबतच त्याची पत्नी शुरा खान, सोहैल, सलमान, सलीम खान, सलमा खान, हेलन, अर्पिता खान, अलविरा अग्निहोत्री हे सर्वजण मलायका आणि तिच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते.

मलायका आणि अरबाज खान यांनी 1997 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. तर मलायका गेल्या काही वर्षांपासून अभिनेते अर्जुन कपूरला डेट करत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं कळतंय. तर दुसरीकडे सीमा आणि सोहैल हे 2020 मध्ये विभक्त झाले. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर सीमा विक्रम अहुजाला डेट करतेय. 1990 मध्ये सीमाचा विक्रमसोबत साखरपुडा झाला होता. मात्र सोहैल खानशी पळून लग्न करण्यासाठी तिने हा साखरपुडा मोडला होता. आता त्याच विक्रमसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.