AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या जन्मानंतर शाहिद कपूर याने मागितली सासऱ्यांची माफी, घाबरलेल्या अवस्थेत म्हणाला…

Shahid Kapoor | मुलीच्या जन्मानंतर शाहिद कपूर याच्यावर का आली सासऱ्यांची माफी मागण्याची वेळ? अभिनेत्याने घाबरलेल्या अवस्थेत सासऱ्यांना फोन केला आणि म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त शाहिद आणि अभिनेत्याच्या लेकीची चर्चा...

मुलीच्या जन्मानंतर शाहिद कपूर याने मागितली सासऱ्यांची माफी, घाबरलेल्या अवस्थेत म्हणाला...
| Updated on: Feb 26, 2024 | 2:18 PM
Share

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिद कपूर याने 2015 मध्ये मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न केलं. कुटुंबियांच्या इच्छेने शाहिद आणि मीरा यांनी लग्न केलं. आज शाहिद – मीरा बॉलिवूडच्या बेस्ट कपलच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर मीरा हिने मुलगी मिशा हिला जन्म दिला. पण मुलीचा जन्म झाल्यानंतर शाहिद याने घाबरलेल्या अवस्थेत सासऱ्यांना फोन केला आणि त्यांची माफी मागितली.

एका मुलाखतीत शाहिद याने मुलीच्या जन्मानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं. अभिनेता म्हणाला, ‘मुलगी झाली मी खूप आनंदी होतो. पण तेव्हा मी घाबरलो होतो. घाबरलेल्या अवस्थेत मी सर्वात आधी सासऱ्यांना फोन केला आणि सर्वात आधी त्यांची माफी मागितली.’

सासऱ्यांना फोन केल्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘मी सासऱ्यांना फोन केला आणि सर्वात आधी त्यांची माफी मागितली. म्हणालो बाबा लग्नाच्या वेळेस मी तुम्हाला थोडा जरी त्रास दिला असेल किंवा माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर मला माफ करा. मी पण आता एका मुलीचा बाप झालो आहे. एक दिवस माझी मुलगी देखील लग्न करून तिच्या नवऱ्याच्या घरी जाईल… ‘

पुढे अभिनेता म्हणाला, ‘खरं सागू तर, माझ्या डोळ्यांसमोर पुढचे 30 वर्ष आले होते. एका मुलीचा बाप असणं फार वेगळी आणि खास भावना आहे. मला आणि मीराला पहिली मुलगीच हवी होती. पूर्वी फार रागीट होतो. मला सतत राग यायचा. पण मिशाच्या जन्मानंतर पूर्ण परिस्थिती बदलली आहे.’ असं म्हणत अभिनेत्याने मुलगी झाल्यानंतर भावना व्यक्त केल्या…

शाहिद आणि मीरा यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. शाहिद कधीच मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत. शाहिद बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पण स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता कायम कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो.

मीरा कपूर हिची ओळख शाहिद कपूर याची पत्नी म्हणून आहे. पण मीरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर मीरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील मीराच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष