AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC | तब्बल 14 वर्षे, 3740 एपिसोड्सनंतर अखेर जेठालालच्या आयुष्यात आला ‘तो’ सुवर्णक्षण, पहा व्हिडीओ

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. यातील काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला, तर काहींची जागा नव्या कलाकारांनी घेतली. मात्र तरीसुद्धा या मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडला नाही. यामध्ये अभिनेते दिलीप जोशी हे जेठालाल तर मुनमुन दत्ता या बबिता अय्यरची भूमिका […]

TMKOC | तब्बल 14 वर्षे, 3740 एपिसोड्सनंतर अखेर जेठालालच्या आयुष्यात आला 'तो' सुवर्णक्षण, पहा व्हिडीओ
Jethalal and BabitaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2023 | 9:34 AM
Share

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. यातील काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला, तर काहींची जागा नव्या कलाकारांनी घेतली. मात्र तरीसुद्धा या मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडला नाही. यामध्ये अभिनेते दिलीप जोशी हे जेठालाल तर मुनमुन दत्ता या बबिता अय्यरची भूमिका साकारत आहेत. जेठालालला बबिताजी किती आवडते हे ‘तारक मेहता..’च्या प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक असेल. मात्र आता तब्बल 14 वर्षांनंतर जेठालालच्या मनाची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जेठालालला चक्क बबिता मिठी मारते. त्यानंतर जे काही घडतं, ते पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाही. एपिसोडमधील हा भाग तारक मेहताच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. तब्बल 3740 एपिसोड्सनंतर जेठालालच्या आयुष्यात असा क्षण आल्याने नेटकऱ्यांनाही व्यक्त होण्याचा मोह आवरत नाहीये. ’14 वर्षांचा वनवास पूर्ण झाला’, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. तर ‘जेठालालला मोक्ष प्राप्त झाला’, अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली. ‘जेठालालचं आयुष्य सफल झालं’, असंही एकाने म्हटलंय.

या लोकप्रिय मालिकेने आतापर्यंत 3740 एपिसोड्स पूर्ण केले. अगदी पहिल्या एपिसोडपासून जेठालालला बबिता आवडत असल्याचं पहायला मिळालं. तिच्यासाठी जेठालाल काहीही करण्यासाठी तयार असतो. मात्र या दोघांमध्ये आजवर असा कोणताच सीन दाखवण्यात आला नव्हता, ज्यामध्ये त्यांची जवळीक पहायला मिळेल. अखेर तो क्षण आल्याने चाहते या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत नव्या टप्पूची एण्ट्री झाली. अभिनेता नितीश भलूनी याने मालिकेत राज अनाडकतची जागा घेतली आहे. तर या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी परतणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. दयाबेन मालिकेत कधी येणार याविषयी दिलीप यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हे तर निर्मात्यांवर अवलंबून आहे. मालिकेत नवीन अभिनेत्री आणायची की नाही, याचा निर्णय तेच घेतील. एक कलाकार म्हणून मला दयाच्या भूमिकेची खूप आठवण येते. बऱ्याच काळापासून प्रेक्षकांनीही दया आणि जेठा यांच्यामधील मजेशीर सीन्सचा आनंद लुटला आहे. जेव्हापासून दिशा या मालिकेतून निघून गेली, तेव्हापासून तो भाग, तो अँगल, ती मजामस्ती गायब आहे. बघुयात, मी तर नेहमीच सकारात्मक विचार करतो. असित भाईसुद्धा नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही.”

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.