AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नौशाद अलींची अन्नपाण्यावाचून 12 तास मेहनत, तेव्हा बनले ‘मुगल-ए-आजम’चे प्रसिद्ध गाणे, वाचा किस्सा…

दिग्दर्शक के.आसिफ यांच्या 1960मध्ये रिलीज झालेल्या 'मुगल-ए-आजम'चे 'जब प्यार क्या तो डरना क्या' हे गाणे कानावर पडले की, या चित्रपटाची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते.

नौशाद अलींची अन्नपाण्यावाचून 12 तास मेहनत, तेव्हा बनले ‘मुगल-ए-आजम’चे प्रसिद्ध गाणे, वाचा किस्सा...
नौशाद अली
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Anish Bendre | Updated on: May 06, 2021 | 9:00 AM
Share

मुंबई : दिग्दर्शक के.आसिफ यांच्या 1960मध्ये रिलीज झालेल्या ‘मुगल-ए-आजम’चे ‘जब प्यार क्या तो डरना क्या’ हे गाणे कानावर पडले की, या चित्रपटाची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते. दिलीप कुमार (Dilip Kumar), पृथ्वीराज कपूर (Pritviraj Kapoor) आणि मधुबाला (Madhubala) या कलाकारांचा अभिनय या गाण्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. लता मंगेशकरांच्या आवाजाची जादू अजूनही आपल्याला हे गाणे ऐकण्यास भाग पाडते. परंतु हे गाणे इतके सुमधुर आणि सुंदर बनवण्याचे श्रेय जर कुणाला गेले, तर ते नौशाद अली साहेब (Music composer Naushad Ali) होते (Veteran Music composer Naushad Ali share an interesting story behind pyar kiya to darna kya song).

नौशाद अली यांना भारतीय हिंदी चित्रपटांतील संगीताचा मास्टर म्हटले गेले, तर ते चुकीचे ठरणार नाही. 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक उत्तम संगीत दिले. चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. त्यांच्या वाद्याची जादू नेहमीच चित्रपटांच्या गाण्यांसोबत मिसळून रसिकांना मोहित करत असे. त्यांच्या गाण्यांमध्ये अभिजात आणि लोकसंगीताचा अद्भुत वापर होता, ज्याने जुन्या आणि सध्याच्या पिढीला भुरळ घातली आहे.

लखनऊमध्ये सुरु झाला सांगीतिक प्रवास

‘बैजू बावरा’ या संगीत चित्रपटांपासून ते  ‘आन’, ‘मदर इंडिया’, ‘मेरे मेहबूब’, ‘अमर’, ‘दुलारी’ यासारख्या सुमारे 67 चित्रपटांमध्ये उत्तम संगीत देत त्यांनी कधी लोकांना हसवले तर कधी रडवले.  नौशाद अली यांचा जन्म लखनऊमध्ये झाला होता. हेच तेच शहर आहे जिथून त्यांचा सांगीतिक प्रवास सुरु झाला. नौशाद साहेबांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला ज्याचे विचार बर्‍यापैकी पुराणमतवादी होते. त्याचे वडील वाहिद अली कोर्टात ‘मुंशी’ म्हणून काम करायचे. लहानपणीच नौशाद यांचा संगीताकडे कल होता. तथापि, त्यांच्या वडिलांना हे संगीत अजिबात आवडत नव्हते. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत नौशाद अली साहब यांनी एकदा त्या दिवसांच्या आठवणीना उजाळा दिला जेव्हा त्यांच्या वडिलांनी संगीत शिक्षणाला तीव्र विरोध केला होता.

जेव्हा वडील म्हणाले, घर किंवा संगीत निवडा…

ते म्हणाले होते की, “जेव्हा मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून माझे उस्ताद बबन साहेब आणि लद्द्न साहेब यांच्याकडून लखनऊमध्येच संगीत शिकलो. यानंतर लखनौचे सितारनवाज असलेले उस्ताद युसुफ अली साहेब यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले. ठुमरी, दादरा ताल आणि ख्यालपर्यंत पोहोचलो तेव्हा माझे लक्ष भरकटले. मी विचार करू लागलो की कदाचित मला हे सर्व नको आहे. मला काय पाहिजे हे मला माहित नव्हते. प्रथम हार्मोनियमवर आणि नंतर सितारवर सराव केला, परंतु कुठेच मन लागत नव्हते.”( Veteran Music composer Naushad Ali share an interesting story behind pyar kiya to darna kya song)

“त्यानंतर मला हळूहळू समजले की माझ्याकडे कंपोजिशन ट्यून करण्याची कला आहे. माझे वडील त्याच्या विरोधात होते. त्याने मला सांगितले- ‘तू कशाला गायकांच्या लाईनमध्ये जातो आहेस. कोणीही तुझ्याशी लग्न करणार नाही आणि तुला पंचायतमधून पूर्णपणे काढून टाकले जाईल.’ एके दिवशी पुन्हा ते म्हणाले की, तुला हे घर हवे आहे की संगीत? ते आताच ठरव. त्यावर नौशादजी म्हणाले, तुम्ही तुमचे घर घ्या आणि मला माझे संगीत द्या. असे म्हणून त्यांनी 1973 घर सोडले आणि निघून गेले.

ज्या फुटपाथवर ते झोपले, 16 वर्षांनंतर त्या समोरील थिएटरमध्ये झाला सन्मान

नौशाद अली यांनी आपल्या वडिलांचे घर सोडले आणि ते थेट मुंबईला गेले, जेथे त्यांना कोणाचाही परिचय नव्हता किंवा ओळखीचे नव्हते. येथे त्यांनी बरीच वर्षे फुटपाथवर घालवली. या फुटपाथसमोर एक थिएटरही होते, जिथे बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांचा सन्मान झाला. हा पुरस्कार नौशाद अली यांना त्यांच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटातील उत्तम संगीतासाठी देण्यात आला होता. त्यावेळी नौशाद साहेब म्हणाले होते, ‘त्या फुटपाथवरून या बाजूस येण्यास मला 16 वर्षे लागली.’

12 तासांत तयार केले ‘मुगल-ए-आजम’चे गाणे

या मुलाखतीदरम्यान नौशाद अली यांनी ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला. या चित्रपटातील एका गाण्यासाठी संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कसाप्रकारे एकाच खोलीत घालवले ते सांगितले. ते म्हणाले होते- ‘मुगल-ए-आजम’ दरम्यान आसिफ यांनी आम्हाला सांगितले की, हा एक सीन आहे आणि तुम्ही त्यावर गाणे बनवावे. गाणे असे असले पाहिजे की लोकांना ते नेहमी आठवेल.’ त्यावर ते म्हणाले की, असं गाणं बनवता येईल की नाही ते देवाच्या हाती आहे.

त्यांनी मुंबईतील आपल्या घरी गीतकार शकील यांना बोलवले. गच्चीवर एक खोली होती, जिथे ते एकटे बसून हे काम करायचे. संध्याकाळचे सहा वाजले होते. त्यांनी दार बंद केले. दोघेही आता बसले होते. तो काहीतरी लिहित होते आणि नौशादजी काहीतरी ट्यून करत होते. खोलीभर कागद पसरले होते. तिथे केवळ कागद विखुरलेले होते,चहा, पाणी, अन्न यातील काहीच नव्हते. किती वेळ गेला हे माहित नव्हते. पण बर्‍याच वेळानंतर त्यांनी मोठा उसासा घेतला आणि मग चर्चा झाली. ते गाणे होते – ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे लिहून जेव्हा दोघे बाहेर आले, तेव्हा पहाटेचे सहा वाजले होते.’ अशा प्रकारे अन्नपाण्यावाचून तब्बल 12 तास मेहनत घेतल्यानंतर एक अजरामर गाणे तयार झाले होते.

(Veteran Music composer Naushad Ali share an interesting story behind pyar kiya to darna kya song)

हेही वाचा :

Video | ‘एक्स अँड नेक्स्ट’ जेव्हा दीपिका-आलिया एकत्र गातात रणबीरचं ‘चन्ना मेरेया’ गाणं, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात सिने कर्मचाऱ्यांना ‘यशराज फिल्म्स’चा मदतीचा हात, 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाची व्यवस्था!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं