AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या

रेखा आणि अमिताभ यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. त्यांच्याबाबत आजही चर्चा होते. ज्या वेळी रेखा आणि अमिताभ यांचे प्रेम फुलत होते, त्या वेळी जया यांच्या कानावरही ही बातमी पोहोचली होती. जया यांनी ही परिस्थिती कशी हाताळली हे फार कमी लोकांना माहीत आहे.

जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 14, 2024 | 10:24 PM
Share

अमिताभ आणि रेखा यांचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नाव आहेत. या दोन स्टार्सची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. रेखा आणि अमिताभ यांच्या चर्चा ही बॉलीवूडमध्ये नेहमीच असते. पण रेखा आणि अमिताभ यांच्याबद्दल बोलणारे हे विसरतात की त्यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आहे आणि ती म्हणजे जया बच्चन. ज्या वेळी रेखा आणि अमिताभ यांचे प्रेम फुलत होते, त्या वेळी जयाच्या कानावरही ही बातमी पोहोचली होती. जया यांनी ही परिस्थिती कशी हाताळली हे फार कमी लोकांना माहीत आहे.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील प्रेमप्रकरण 1976 मध्ये ‘दो अंजाने’ चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाले होते. पण शूटिंगदरम्यान रेखासोबत गैरवर्तन केल्याबद्दल अमिताभ यांनी सहकलाकाराला मारहाण केल्याने ही गोष्ट सगळ्यांना कळाली. नंतर ही गोष्ट जयापर्यंत पोहोचली. ‘सिलसिला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अमिताभ या दोघांनीही फक्त अभिनयच केला नसून प्रत्यक्षात एकमेकांवर प्रेम केल्याचेही बोलले जाते.

View this post on Instagram

A post shared by Rekha (@legendaryrekha)

जेव्हा ही प्रेमाची बातमी जया यांच्या कानावर पोहोचली तेव्हा जया यांनी काय केले हे ज्यांना माहित आहे ते आजही जया बच्चन यांच्या धाडसाचे कौतुक करतात. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बातम्या येताच जया यांनी रेखाला आपल्या घरी जेवायला बोलावलं. रेखालाही माहित होतं की जयाला तिच्या आणि अमिताभबद्दल सगळं माहीत आहे, त्यामुळे तिच्या घरी जेवायला जाणं थोडं विचित्र होतं. रेखाला वाटले की जया घरी आल्यावर खूप रागावेल किंवा काहीतरी चुकीचे बोलेल. पण जयाने तसे काही केले नाही.

View this post on Instagram

A post shared by Rekha (@legendaryrekha)

रेखा अमिताभ यांच्या घरी गेल्यावर जया यांनी त्यांचे स्वागत केले.जया रेखाला खूप प्रेमाने भेटली आणि तिला जेवण खाऊ घातले. पण तिला भेटण्यापूर्वी जया रेखाला असे काही बोलली की ती अमिताभच्या घरी परत आली नाही ना त्यांच्या आयुष्यातून ही निघून गेली. जया रेखाला म्हणाली की, मी अमितला कधीही सोडणार नाही.

जया यांच्या या विधानामुळे रेखाला समजले की अमिताभ आणि त्यांचे नातं जरी जुळलं असलं तरी ते कधीही एकत्र होऊ शकत नाहीत.  खऱ्या आयुष्यात त्यानंतर रेखाने पुन्हा कधीच अमिताभ यांच्या घरात पाऊल ठेवले नाही किंवा अमिताभसोबत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. जया बच्चन यांच्या या विधानाने दोघांचीही प्रेम कहाणी संपली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा