AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रील सुनेशी साखरपुडा, ‘मी टू’मध्ये दिसला खरा चेहरा; आता कुठे आहेत ‘संस्कारी बाबू’जी?

आपल्या भूमिकांमुळे 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख मिळवलेले अभिनेते आलोक नाथ यांचा आज वाढदिवस आहे. आलोक नाथ यांनी विविध चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याचसोबत त्यांचं खासगी आयुष्य सतत चर्चेत राहिलं आहे.

रील सुनेशी साखरपुडा, 'मी टू'मध्ये दिसला खरा चेहरा; आता कुठे आहेत 'संस्कारी बाबू'जी?
Alok NathImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2024 | 1:47 PM
Share

टीव्ही आणि बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ हे आज (10 जुलै) त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मालिका आणि फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारे आलोक नाथ गेल्या काही काळापासून प्रकाशझोतात नाहीत. त्यांनी 1980 मध्ये ‘रिश्ते-नाते’ या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्यांनी बाबूजींची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल्याने पुढेही त्यांना अशाच भूमिका मिळाल्या आणि त्यांची ओळखच ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून झाली. आलोक नाथ यांनी ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही काळापासून ते मोठ्या आणि छोट्या पडद्यापासून दूर आहेत.

आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप

आलोक नाथ यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप झाले होते. निर्माती आणि लेखिका विनता नंदा यांनी आलोक यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर संध्या मृदुल आणि दीपिका आमीन यांनीसुद्धा त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते, “जर मी एखाद्या मुलीची छेडछाड केली असेन, तर ती 25 वर्षांनंतर त्याचा खुलासा का करतेय? ती त्याचवेळी याबद्दल का बोलली नाही?” हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र या घटनेनंतर ते पुन्हा इंडस्ट्रीत दिसले नाहीत. विनता नंदा यांनी केलेल्या आरोपांविरोधात काही ठोस पुरावे न मिळाल्याने तो केस बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर CINTAA मधून आलोक नाथ यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.

रील लाइफ सुनेशी साखरपुडा

आलोक नाथ यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, ‘बुनियाद’ या मालिकेत काम करताना त्यांचा जीव अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यावर जडला होता. या मालिकेत नीना गुप्ता यांनी आलोक नाथ यांच्या सुनेची भूमिका साकारली होती. या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, अशीही चर्चा होती. मात्र काही कारणास्तव या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर आलोक नाथ यांनी 1987 मध्ये आशु सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. त्या ‘बुनियाद’ या मालिकेच्या प्रॉडक्शन असिस्टंट होत्या.

आलोक नाथ यांचं खासगी आयुष्य बरंच वादग्रस्त राहिलं आहे. 2017 मध्ये त्यांचा मुलगा शिवांग हा दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे चर्चेत होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. दंड भरल्यानंतर त्यांच्या मुलाची सुटका झाली होती.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.