AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सत्य आलं समोर

अभिषेक-करिश्माचं लग्न का होऊ शकलं नाही? दिग्दर्शकाने सांगितलं कारण

अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सत्य आलं समोर
करिश्मा कपूर अभिषेक बच्चनImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 22, 2022 | 11:56 AM
Share

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत बऱ्याच कलाकारांचे अफेअर्स चर्चेत राहिले आहेत. यातील काही लव्ह-स्टोरी लग्नापर्यंत पोहोचल्या, तर काही त्याआधीच संपल्या. बॉलिवूडमध्ये एक जोडी अशीही होती, ज्यांनी साखरपुडा केला, मात्र लग्नाआधीच त्यांचं नातं संपलं. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची ही जोडी होती. या दोघांचं अफेअर सर्वश्रुत होतं. त्यांचा साखरपुडा पार पडलेला आणि दोघं लग्नसुद्धा करणार होते. मात्र नंतर असं काही घडलं की कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमधील हे नातंच तुटलं. या घटनेच्या कित्येक वर्षांनंतरही अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी अखेर एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं. सुनील दर्शन यांनी 2000 मध्ये ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांसोबत काम केलं होतं.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील यांना अभिषेक-करिश्मामधली जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्याचसोबत अभिषेक-करिश्माचं नातंसुद्धा संपुष्टात आलं.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन म्हणाले, “अभिषेक-करिश्माच्या नात्याची अफवा नव्हती, ते सत्य होतं. ते दोघं लग्न करणार होते. मी स्वत: त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होतो.” या दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही, याची चुणूक सुनील दर्शन यांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच लागली होती.

“अभिषेक आणि करिश्मा हे सेटवर नेहमीच एकमेकांशी भांडायचे. या दोघांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ अशी नव्हती. सतत त्यांच्यात भांडणं व्हायची. कदाचित काही लोकांचं नातं असंच असतं. मला नेहमीच प्रश्न पडायचा की खरंच हे दोघं एकमेकांसाठी बनले आहेत का? अभिषेक आणि करिश्मा दोघं स्वभावाने चांगले आहेत. पण दोघांच्या नशिबात एकत्र राहणं नव्हतं,” असं ते म्हणाले.

करिश्मा आणि अभिषेक सध्या आपापल्या आयुष्यात व्यग्र आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर करिश्माने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं होतं. मात्र 2016 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं आहेत.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?