AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? कारण जाणून व्हाल हैराण

अंबानी कुटुंब कायम त्यांच्या रॉयल आणि क्लासी लाईफस्टाईलमुळे असतात चर्चेत... पण कोट्यवधी रुपयांचे दागिने घालणाऱ्या अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? फार कमी लोकांना माहिती आहे सत्य...

अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? कारण जाणून व्हाल हैराण
| Updated on: Mar 17, 2024 | 12:51 PM
Share

मुंबई | 17 मार्च 2024 : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. नुकताच अंबानी कुटुंबाचा लहाना मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात जामनगर याठिकाणी पार पडला. कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील महिलांनी कोट्यवधी रुपयांचा कपडे आणि दागिने घातले होते. प्रत्येकाच्या नजरा अंबानी कुटुंबियांच्या महिलांनी घातलेल्या दागिन्यांवर येऊन थांबल्या. पण त्यांच्या हाताला बांधलेल्या काळ्या धाग्याकडे फार कमी लोकांचं लक्ष गेलं.

सांगायचं झालं तर, नीता अंबानी यांच्यापासून कुटुंबाची होणारी सून राधिका यांच्या हाताला देखील काळा धागा बंधलेला दिसला. पण अंबानी कुटुंबातील महिला हाताला काळा धागा का बांधतात याचं कारण फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबातील महिलांची चर्चा रंगली आहे.

तर आता जाणून घेऊ अंबानी कुटुंबातील महिला हाताला काळा धागा का बांधतात. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी उद्योजिका देखील आहे. याशिवाय, फिटनेस, डिझायनर कपडे, दागिने इत्यादी गोष्टींमुळे नीता अंबानी चर्चेत असतात. त्यांच्या हातात देखील कायम काळा धागा दिसतो.

असं म्हणतात की, काळा धागा घातल्यामुळे निश्चित यश मिळतं… शिवाय वाईट नजरे पासून देखील आपला बचाव होतो. एवढंच नाहीतर, आजारांपासून दूर ठेवण्यासाठी देखील काळा धागा मदत करतो… असं देखील सांगण्यात येतं. म्हणून अंबानी कुटुंबातील महिला घराबाहेर पडताना काळा धागा हाताला बांधतात अशी चर्चा आहे.

नीता अंबानी यांची मुलगा ईशा अंबानी देखील पारंपरिक, वेस्टर्न ड्रेसवर देखील हाताला काळ धागा बांधतात. तर कुटुंबाची मोठी सून देखील परंपरा, प्रथा जपण्याचा प्रयत्न करत असते. आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांच्या हाताला देखील काळा धागा कायम बांधलेला असतो.

अंबानी कुटुंबाची लहान आणि होणारी सून राधिका यांच्या हाताला देखील काळा धागा असल्याचं प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दिसून आलं. राधिका देखील हाताला काळा धागा बांधतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका – अनंत याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांची प्री-वेडिंग फंक्शन्स आता संपली आहेत. आता या जोडप्याचं जुलैमध्ये भव्य लग्न होणार आहे. ज्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. 12 जुलै रोजी दोघांचं लग्न करणार आहेत.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......