AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज या चुका करणारी माणसं ठरतात मूर्ख, स्वत:च बनतात आपल्या शरीराचे शत्रू; तुम्हीही करता का या चुका?

निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच तज्ज्ञ या 5 चुका कधीही न करण्याचा सल्ला देतात.

दररोज या चुका करणारी माणसं ठरतात मूर्ख, स्वत:च बनतात आपल्या शरीराचे शत्रू; तुम्हीही करता का या चुका?
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 04, 2023 | 10:39 AM
Share

नवी दिल्ली – निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली असणे अत्यंत (good lifestyle) आवश्यक आहे. पण जीवनशैली म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? खरंतर आपण दररोज काय करतो आणि ते (काम ) कसे करतो, यावरून आपली जीवनशैली ठरते. यामध्ये खाणेपिणे, व्यायाम,झोप, ताणतणाव (exercise) या सर्वांचा समावेश होतो. आपलं शरीर आजारी का पडतं? जेव्हा आपली जीवनशैली बिघडू लागते, तेव्हा शारीरिक अवयवांवरही परिणाम होतो. हळूहळू हृदय, फुफ्फुसे, यकृत, पोट इत्यादी कमकुवत होऊन आजारांनी घेरले जाते. त्यामुळे रोजच्या जीवनात होणाऱ्या या 5 चुका (avoid mistake) टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात

कच्चे सॅलॅड खाणे

सॅलॅडमध्ये कच्च्या भाज्या आणि फळे असतात, ज्यामुळे थंडपणा आणि कोरडेपणा निर्माण होतो. याचे रोज सेवन केल्याने पचनसंस्थेची आग थंड होऊ लागते. त्यचे दूरगामी परिणाम म्हणजे पोट फुगणे आणि गॅसेस होणे. म्हणून कच्चे सॅलॅड जास्त प्रमाणात खाणे टाळावे. हेल्दी फॅट आणि मसाल्यांमध्ये हलके शिजवलेले सॅलॅड खावे.

रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिणे

रिकाम्या पोटी सर्वप्रथम कोमट पाणी प्यायले पाहिजे. त्यामुळे दिवसभर पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायल्यास शरीरात बरीच विषारी द्रव्ये तयार होतात.

कोणत्याही वेळेस शौचाला जाणे

तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी शौचाला जाता का?असे केल्याने शरीरातील घाण पूर्णपणे साफ होत नाही. सकाळी उठल्यापासून दोन तासांत पोट साफ करायला हवे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. तसेच पोट साफ करण्यापूर्वी पाण्याशिवाय कोणतेही पदार्थ सेवन करू नका किंवा कोणतेही पेय पिऊ नका.

अन्न न चावता खाणे

अन्न हे 32वेळा चावून खाल्ले पाहिजे, त्यामुळे पचन नीट होते. तसेच जेवताना इतर कोणतेही काम करू नये.

खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करणे

जेव्हा आपण काही खातो तेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते. ही उष्णता विशेषत: पचनसंस्थेत निर्माण होते, त्यानंतर लगेच आंघोळ केल्याने त्यात व्यत्यय येऊ शकतो आणि शरीरात त्रास होऊ शकतो. म्हणून जेवल्यावर लगेच अंघोळ करू नये.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?