AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine : भारतातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना Corbevax लस देणार, जाणून घ्या या लसीची वैशिष्ट्ये

कॉर्बिवॅक्स ही देशातील पहिली प्रोटीन सबयुनिट लस आहे. तर देशातच बनवलेली ही तिसरी कोरोना लस आहे. प्रथिने सब्यूनिट लस म्हणजे संपूर्ण विषाणूऐवजी व्हायरसचा एक भाग वापरून प्रतिकारशक्ती निर्माण करते. या लसीमध्ये कोरोना विषाणूच्या एस प्रोटीनचा वापर करण्यात आला आहे.

Corona Vaccine : भारतातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना Corbevax लस देणार, जाणून घ्या या लसीची वैशिष्ट्ये
भारतातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना Corbevax लस देणारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 1:10 AM
Share

नवी दिल्ली : भारत सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या पॅनेलने 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लस Corbevax ची शिफारस केली आहे. DCGI च्या तज्ञ समितीने भारत बायोटेककडून कोविड-19 लसीवर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये लसीच्या वापरासाठी इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन (EUA) अर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी अधिक डेटा मागवला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, बायोलॉजिकल ई ला 5 ते 18 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी घेण्याची परवानगी मिळाली. या वयोगटातील फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. (Corbevax vaccine will be given to children above 5 years of age in India)

काय आहेत या लसीची वैशिष्ट्ये ?

कॉर्बिवॅक्स ही देशातील पहिली प्रोटीन सबयुनिट लस आहे. तर देशातच बनवलेली ही तिसरी कोरोना लस आहे. प्रथिने सब्यूनिट लस म्हणजे संपूर्ण विषाणूऐवजी व्हायरसचा एक भाग वापरून प्रतिकारशक्ती निर्माण करते. या लसीमध्ये कोरोना विषाणूच्या एस प्रोटीनचा वापर करण्यात आला आहे. लसीद्वारे एस प्रोटीन शरीरात प्रवेश करताच, रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि व्हायरसशी लढा देते. Corbivax भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्डप्रमाणे लागू केले जाईल. ही एक इंटरमस्क्यूलर लस देखील आहे जी इंजेक्शनद्वारे दिली जाईल. या लसीचे दोन डोस दिले जातील. दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असेल.

लसीचा प्रभाव आणि किंमत किती?

ही लस फेज 2 आणि फेज 3 चाचण्यांमध्ये प्रभावी ठरली आहे. मात्र, ही लस मुलांवर किती प्रभावी ठरली आहे, याचा डेटा कंपनीने दिलेला नाही. तथापि, प्रौढांवर केलेल्या चाचण्यांमध्ये, ही लस 80% पर्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही लस वुहानमध्ये आढळलेल्या स्ट्रेन विरूद्ध 90% प्रभावी आहे आणि डेल्टा प्रकारावर 80% पर्यंत प्रभावी आहे. कंपनीचा दावा आहे की कॉर्बेवॅक्सचे कोविशील्डपेक्षा 50 % कमी दुष्परिणाम आहेत.

केंद्र सरकारकडून ही लस देशातील प्रत्येकाला मोफत दिली जात आहे. मात्र, सरकारी रुग्णालयातही लसीकरण केले जात आहे. सरकारी रुग्णालये आणि सरकारी केंद्रांमध्ये कॉर्बीवॅक्स मोफत मिळणार आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये एका डोसची किंमत 145 रुपये असू शकते. (Corbevax vaccine will be given to children above 5 years of age in India)

इतर बातम्या

Corona : राज्यात आज 121 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईत 68 नवीन कोरोनाबाधीत

Health Tips : तुमचं वय आणि शरिरातील साखरेचं प्रमाण मॅच होतंय का? वयानुसार साखरेचं प्रमाण किती असावं? जाणून घ्या…

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.