AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवास केल्यानंतर तुमचेही पोट होते का खराब? मग या टिप्स ठरतील फायदेशीर

बहुतेक लोकांना प्रवास करायला प्रचंड आवडतो. पण प्रवास केल्यानंतर काहींना पोटाचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हालाही पचनाशी संबंधित त्रास होत असेल तर तुम्ही हे चार सोपे आयुर्वेदिक उपाय करू शकता. यामुळे तुम्हाला प्रवासादरम्यान पचनाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाही.

प्रवास केल्यानंतर तुमचेही पोट होते का खराब? मग या टिप्स ठरतील फायदेशीर
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 12, 2025 | 3:08 PM
Share

वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला हे सर्वांनाच आवडते. पण फिरायला जाण्यासाठी बराच वेळ प्रवास करावा लागतो. प्रवास केल्यानंतर पचनाशी संबंधित समस्या उद्भवणे ही एक सामान्य समस्या आहे. प्रवास करताना एकाच जागी बराच वेळ बसावे लागते. त्यामुळे पोटावर जास्त दाब पडतो त्यामुळे ब्लोटिंग, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यासारख्या सामान्य समस्या उद्भवतात. याशिवाय कुठेही जाताना खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते. प्रवासादरम्यान खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नसतील तर त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. प्रवासानंतर आतड्यांचे आरोग्य राखणे फार महत्त्वाचे आहे. याची काळजी न घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रवासादरम्यान उपयोगी पडतील अशा काही टिप्स जाणून घेऊ. ज्यामुळे प्रवासाला गेल्यावर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत.

रोज खात त्रिफळा

त्रिफळा खाल्ल्याने पोट साफ होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्याची समस्या असेल तर त्रिफळा खाने फायदेशीर ठरते. तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर प्रवासापूर्वी आणि प्रवासानंतर त्रिफळाचे चूर्ण खा यामुळे पचनक्रिया सुधारते.

हलके अन्न खा

प्रवासात अनेकदा जड अन्न खाल्ल्या जाते. पण सतत बसल्यामुळे अन्न पचत नाही त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. प्रवासादरम्यान नेहमी हलके अन्नच खा. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाही.

पुरेसे पाणी प्या

जर तुम्हाला आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शक्य तितके पाणी पिण्याचा प्रयत्न करा. प्रवास करताना अनेक जण पाणी कमी पितात असे लक्षात येते. त्यामुळे पोट फुगणे आणि ॲसिडिटी होते. या सोबतच आहारामध्ये शक्य झाल्यास लिक्विड आहाराचा समावेश करा.

थोड्या वेळ चाला

प्रवासातून परतल्यानंतर तुमच्या दिनचर्येत चालणे समाविष्ट करा. यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते. जेवण झाल्याच्या नंतर चालण्याची सवय लावा. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि पचनाशी संबंधित कोणतीच समस्या उद्भवत नाही. आपण 15 ते 20 मिनिटे रोज चालले तरी पुरेसे आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.