AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायी चालल्याने शुगर लेव्हल कमी होते का ? काय म्हणतात अमेरिकन तज्ज्ञ

चालल्याने सर्वसाधारण लोकांना फायदा होत असतो. परंतू डायबिटीजच्या रूग्णांना चालल्याने नेमका काय फायदा होत असतो, पाहूयात

पायी चालल्याने शुगर लेव्हल कमी होते का ? काय म्हणतात अमेरिकन तज्ज्ञ
MORING WALKImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 22, 2023 | 5:23 PM
Share

नवी दिल्ली : डायबिटीज ( DAIBETES ) हा आजार जगभरात वाढत आहे. आपल्या राहणीमान किंवा लाईफस्टाईलशी संबंधित हा आजार आहे. जे लोक अधिक हालचाल करतात त्यांना डायबिटीज आजारात कमी धोका असताे. या आजारात फास्टींग ब्लड शुगर लेव्हल  ( fasting sugar level )  पासून ते जेवणानंतरच्या शुगर लेव्हलवर लक्ष ठेवावे लागते. या मध्ये रक्तातील शुगर लेव्हलचे संतुलन कायम राखावे लागते. अशा स्थितीत डाएटींग सोडून चालण्याच्या व्यायामाद्वारे शुगरवर कितपत नियंत्रण ठेवता येत का ते पाहूयात….

डायबिटीज म्हणजे मधुमेहाच्या आजारात शरीरातील शुगरचे ज्वलन होणे महत्वाचे असते. त्यामुळे डायबिटीजच्या रूग्णांनी अधिकाधिक चालणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होत असतो. आपल्या शरीराची हालचाल झाल्याने आपल्याला उत्साही वाटायला लागते. शरीराची हालचाल करण्यासाठी रोज वेगाने चालल्यामुळे आपल्याला तरतरीत वाटून आपले वजनही कमी होण्यास मदत मिळते. आपण कमी कॅलरीचा आहार घ्यायला हवा परंतू स्नायूंचे नुकसान रोखण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार असावा. मात्र चालण्याने खरेच शुगर कमी होत असते का ? पाहूया विस्ताराने…

अमेरिकन डायबिटीज असोसिएशन

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते डायबिटीज रूग्णांनी सक्रिय रहाणे गरजेचे असते. जे लोक अधिक हालचाल करतात आणि सतत क्रियाशील राहतात त्यांना डायबिटीजचा सर्वात कमी धोका असतो. वास्तविक जेवढ्या वेगाने आपण चालता तेवढ्या वेगाने आपली शुगरची लेव्हल कमी होत जाते. वेगाने चालल्याने पेनक्रियाज पेशी वेगाने काम करण्यास चालना मिळते, चालल्याने शुगर मेटाबोलिज्ममध्ये वेग येते. आणि अन्नातील शर्करा वेगाने पचून रक्तातील तिची पातळी वाढण्यापासून संरक्षण मिळते. पायी चालल्याने आपल्या शरीरातील शुगरची पातळी कमी होण्यास मदत मिळत असते.

डायबिटीजमध्ये किती वेळ चालायला हवे

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते दररोज आपण दहा हजार पावले चालायला हवे, किंवा किमान अर्धा तास तरी चालायला हवे, तर शुगर लेव्हल कमी व्हायला मदत मिळेल. जर तुम्हाला अर्धा तास चालायला अडचण येत असेल तर दिवसभरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी दहा – दहा मिनिटे चालायला जा, यावेळी डाएट कंट्रोल करावे, ज्याला पचन करण्यासाठी जास्त चालावे लागते असा आहार कमी करावा, हलके फुलके जेवण करावे, अशा प्रकारे डायबिटीजच्या रूग्णांनी वेळात वेळ काढून चालायला हवे, आपल्या किती वेगात चालायचे आहे. याचा विचार आपण आपल्या प्रकृतीनूसार आपण करायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.