AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या

जेव्हा केसांना योग्य पोषण आणि काळजी घेतली जात नाही, तेव्हा ते केवळ कमकुवतच होत नाहीत तर गळणे देखील वेगवान होते. यामुळे केसांची वाढही मंदावते. केस कमकुवत होण्यामागे तुमची कोणती चूक कारणीभूत ठरू शकते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

'या' चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jan 17, 2025 | 10:09 PM
Share

केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट परिणाम होत असतात. अशावेळी केस गळतीमुळे केसांची वाढही मंदावते, केस पातळ होऊन गळू लागतात. बहुतेक लोकं या समस्येने त्रस्त आहेत. केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुण वर्ग केसांशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्वचारोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामध्ये तणाव, चुकीचा आहार, अनुवांशिकता आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्या उद्भवल्यामुळे केसांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही.

आयुर्वेदिक डॉ. मनीषा मिश्रा सांगतात की, कधीकधी केस गळणे हे हेअर सायकलमुळेदेखील होते, पण वारंवार केस गळत असतील तर त्याचा ही केसांच्या वाढीवर परिणाम होतो. अशावेळी केसांची वाढ वाढवण्यासाठी लोकं डाएटपासून ट्रीटमेंटपर्यंत अनेक गोष्टी करतात. पण तरीही त्यांना हवे तसे परिणाम मिळत नाही. पण तुमच्या या चुकांमुळे सुद्धा केसांची वाढ मंदावण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. चला जाणून घेऊयात.

इंटरमिटेंट फास्टिंग

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आजकाल अधूनमधून उपवास करण्याचा ट्रेंड खूप दिसून येत आहे. जे लोकं डायटिंग करत आहेत ते या डाएट प्लॅनला खूप फॉलो करत आहेत. तुम्ही देखील अधूनमधून उपवास करत असाल तर तुमच्या केसांच्या वाढीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. कारण तुम्ही उपवासाच्या वेळी कोणतेच आहार सेवन करत नाही त्यामुळे शरीरात पुरेशा पोषक तत्वांची कमतरता भासू लागते जे केसांच्या वाढीसाठी समस्या निर्माण करतात.

हार्मोन असंतुलन

तज्ञाच्या म्हणण्यानुसार हार्मोन्सच्या असंतुलनाचा देखील केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. पित्ताच्या त्रासामुळे हार्मोन्स असंतुलन देखील होऊ शकतात. यामुळे केस अधिक कमकुवत होतात. विशेषत: महिलांनी हार्मोनल बदलांची अधिक काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार योग्य ठेवणे.

जास्त ताण आणि बाहेर खाणे

आयुर्वेद तज्ज्ञ मनीषा मिश्रा म्हणतात की, केसांची वाढ मंदावण्यामागे अतिताण देखील कारणीभूत आहे. तुम्ही जितका जास्त ताण घेता, तितकाच त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे मेडिटेशन आणि योगाभ्यास करा. तसेच बाहेरचे जंकफूड पदार्थ खाणे टाळा. जास्त सोडियम आणि मसाले असलेल्या गोष्टी केसांच्या वाढीस परिणाम करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.