AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Metabolism: मेटाबॉलिजम नसेल सुरळीत तर बिघडेल आरोग्य, करा हे उपाय

मेटाबॉलिजम (चयापचय) म्हणजे , अन्नाद्वारे मिळणाऱ्या उर्जेचा शरीरातील पेशी कसा वापर करतात. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, बिघडलेली जीवनशैली यामुळे मेटाबॉलिजम बिघडू शकते.

Metabolism: मेटाबॉलिजम नसेल सुरळीत तर बिघडेल आरोग्य, करा हे उपाय
मेटाबॉलिजम नसेल सुरळीत तर बिघडेल आरोग्य, करा हे उपाय Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2022 | 11:00 AM
Share

नवी दिल्ली: मेटाबॉलिजम (Metabolism) अर्थात चयापचयाचा दर जितका जास्त असेल, तितक्या जास्त कॅलरीज तुम्ही बर्न करू शकाल. तुम्ही जितक्या जास्त कॅलरी (calories) बर्न करता, तितके तुमचे वजन कमी होते. बऱ्याच वेळेस डॉक्टर म्हणतात की जर शरीराचे मेटाबॉलिजम चांगले नसेल तर आपले आरोग्यही चांगले राहणार नाही. मेटाबॉलिजम जितके चांगले तितके शरीर विषारी पदार्थ आणि चरबी (burns fat) कमी करू शकेल. त्यासह, शरीर मूत्र आणि विष्ठेद्वारे शरीरातून वाईट पदार्थ सहजपणे काढून टाकते. मात्र, मेटाबॉलिजम चांगले नसेल तर मधुमेहासारखा आजार (health problem) होण्याचा धोका असतो.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बिघडलेली जीवनशैली आणि झोपेचा बिघडलेला पॅटर्न यामुळे मेटाबॉलिजम खराब होऊ शकते. त्यामुळे पचनतंत्रही बिघडचे. ज्येष्ठ फिजिशिअन डॉ. कवलजीत सिंह यांच्या मते, मेटाबॉलिजम (चयापचय) म्हणजे , अन्नाद्वारे मिळणाऱ्या उर्जेचा शरीरातील पेशी कसा वापर करतात. या ऊर्जेमुळेच आपण आपली दैनंदिन कामे करतो.

शरीरात चयापचय प्रक्रिया चालू असते. हे नवीन पेशी तयार करण्यात मदत करते आणि खराब पदार्थ देखील शरीराबाहेर काढते. या स्थितीमध्ये हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप-2 मधुमेह तसेच सांधेदुखीची समस्याही उद्भवू शकते.

मेटाबॉलिजमबद्दल लोकांच्या मनात काही गैरसमजही आहेत. त्यापैकी एक भ्रम म्हणजे मेटाबॉलिजम चांगले ठेवण्यासाठी व्यक्तीने कमी (अन्न) खाल्ले पाहिजे. मात्र असे नाहीये. सर्व लोकांनी आपल्या शरीरानुसार कॅलरीचे सेवन केले पाहिजे . जे लोक जास्त व्यायाम करतात त्यांनी जास्त कॅलरींचे सेवन केले पाहिजे.

अन्न कमी केल्याने आपले शरीर योग्य स्थितीत राहील, असे होत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये मेटाबॉलिजम रेट हा वेगवेगळा असतो आणि त्याच पद्धतीने शरीरही काम करते. मात्र, ज्या व्यक्तीच्या शरीरात मेटाबॉलिजम योग्य पद्धतीने होणार नाही, त्या व्यक्तीला सतत काही ना काही आरोग्यासंदर्भातील त्रास होत राहील. अशा परिस्थितीत मेटाबॉलिजम योग्य राखणे खूप गरजेचे आहे.

असे ठेवा नियंत्रण

ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अजय कुमार यांच्या सांगण्यानुसार, मेटाबॉलिक समस्या (चयापचयाची समस्या) अनेकदा वयाच्या 30 व्या वर्षानंतर सुरू होते. मात्र ते योग्य ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी रोज व्यायाम करावा, तसेच खाण्यापिण्याचीही काळजी घ्यावी.

सतत एका जागी तासनतास बसून राहू नये. कामातून मधेमध्ये ब्रेक घेत रहावा. तसेच झोपेच्या बाबतीतही निष्काळजीपणा करू नये. प्रत्येक व्यक्तीला किमान 8 तास झोप गरजेची असते. झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक वेळ निश्चित करावी व ती काटेकोरपणे पाळण्याचाही प्रयत्न करावा. ग्रीन टीचे सेवन करावे आणि भरपूर पाणी प्यावे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर