AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खास टीप्स, नावडती भाजी होईल आवडती…

कारल्यामध्ये शरीरास फायेशीर ठरतील असे अनेक गुणधर्म आहेत. पण कारल्याची भाजी कडू असल्यामुळे कोणी खात नाही. अशात कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी जाणून घ्या खास टीप्स

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खास टीप्स, नावडती भाजी होईल आवडती...
| Updated on: May 21, 2026 | 4:08 PM
Share

कारले कडू असले तरी आरोग्यास अधिक फायदेशीर आहे. कारले त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. कराल्यामध्ये रक्तातील साखरेचे नियमन, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि परजीवींपासून संरक्षण, पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे… यांसारखे गुणधर्म असतात. असं म्हणतात की, कारले जितके जास्त कडू असते, तितके ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यापासून ते पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, त्यात अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत. बहुतेक लोक कडू चवीमुळे कारले खाणे टाळतात, तरी काही सोप्या घरगुती युक्त्या वापरून तुम्ही ते इतके स्वादिष्ट बनवू शकता की लहान मुलांनाही ते सहज आवडेल.

कारल्याची कडू चव कमी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे मीठ आणि हळद वापरणे. चिरलेल्या कारल्यावर मीठ आणि हळद लावा आणि सुमारे 30 मिनिटे तसेच ठेवा. यामुळे कारल्यातील कडू रस बाहेर येईल आणि त्याची चव लक्षणीयरीत्या कमी होईल.

कडूपणा आणखी कमी करण्यासाठी लिंबाचा रस देखील मदत करू शकतो. कारल्याच्या फोडींवर थोडे लिंबू पिळून 20 – 30 मिनिटे तसेच ठेवा. लिंबाचा आंबटपणा कडूपणा संतुलित करतो आणि चव वाढवतो. यामुळे कारल्यामधील व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढण्यासही मदत होते.

कारले अर्धवट उकळण्याची एक युक्ती अनेक घरांमध्ये वापरली जाते. पाण्यात चिमूटभर मीठ घालून कारले दोन मिनिटे उकळा, आणि नंतर लगेचच ते थंड पाण्यात बुडवा. यामुळे त्याची चव सौम्य होते आणि फळ अधिक रुचकर बनते. असे केल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो.

दुसरी एक सोपी पद्धत म्हणजे कारल्यातील बिया काढून टाकणे. खरे तर, बहुतेक कडूपणा बियांमध्ये आणि त्यांच्या कुरकुरीत बाहेरील सालीमध्ये असतो. त्यामुळे, साल हळुवारपणे खरवडून बिया काढल्याने चवीत लक्षणीय बदल होतो. बरेच लोक सुक्या कारल्यामध्ये थोडा गूळही घालतात, ज्यामुळे कडूपणा संतुलित होतो आणि ते मुलांना अधिक रुचकर वाटते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारल्यासोबत दूध, दही, ताक, मुळा, भेंडी, आणि आंबा यांसारख्या गोष्टी खाणे टाळावे. यामुळे अपचन, ॲसिडिटी, पोटदुखी आणि त्वचेवर खाज येणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.

Follow Us
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या...
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या....
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा.
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....