AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; केतनच्या वडिलांचे थेट राष्ट्रपतींना पत्र, म्हणाले, ‘मुलगा-वडील दोन्ही गेले, आता…’

ketan agarwal news : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; केतनच्या वडिलांचे थेट राष्ट्रपतींना पत्र, म्हणाले, 'मुलगा-वडील दोन्ही गेले, आता...'
| Updated on: Jul 11, 2026 | 1:15 PM
Share

देशभरात गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. केतनची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीवर कठोर कारवाई व्हावी, याची मागणी जोर धरू लागली आहे. राजा सोनम रघुवंशी प्रकरणाशी तुलना करत आरोपी सियाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर 20 दिवसांनी त्याच्या आजोबाचं निधन झालं. त्यामुळे अग्रवाल कुटुंब मोठ्या दु:खात आहे. याचदरम्यान केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं. त्यांनी राष्ट्रपतींकडे मुलाला न्याय मिळवून देण्याची आर्त हाक मारली आहे. पत्र लिहिताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. कोणतीही राजकीय किंवा व्यावसायिक ओळख न वापरता, केवळ एक हतबल पिता म्हणून न्याय मागत असल्याचे म्हटले आहे.

विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात एका अत्यंत दुर्दैवी घटनेचाही उल्लेख केलाय. केतनच्या निर्घृण हत्येच्या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही, तोच अवघ्या २० दिवसांत विशाल अग्रवाल यांच्या वडिलांचेही निधन झालं. नातवाच्या मृत्यूचा धक्का आणि सततचा मानसिक तणाव सहन न झाल्यामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलंय. अवघ्या २० दिवसांत तरुण मुलगा आणि वृद्ध वडील या दोघांनाही गमावल्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.

​पीडित वडिलांनी राष्ट्रपतींकडे या पत्राद्वारे काय मागणी केली?

केतन अग्रवाल प्रकरणाची ​जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी. न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबाच्या वेदना आणखी वाढत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जावी. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी. या अमानुष गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या दोषींना कायद्यानुसार शक्य असलेली कठोर शिक्षा दिली जावी, जेणेकरून समाजात अशा प्रकारच्या घृणास्पद गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही,अशी मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती